सहा तालुक्‍यांतील १४५ गावांवर जलसंकट
सहा तालुक्‍यांतील १४५ गावांवर जलसंकट 
मुख्य बातम्या

सहा तालुक्‍यांतील १४५ गावांवर जलसंकट

टीम अॅग्रोवन

वर्धा  ः उन्हाळ्यात निर्माण होणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यासाठी १०४ उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. १४५ गावांसाठीच्या या उपाययोजनांवर तब्बल २ कोटी ६९ लाख ७८ हजार रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या वर्षी पाऊसमान चांगले झाले असले, तरी काही भागांत सरासरी इतक्‍या पावसाची नोंद झाली नाही. परिणामी, या भागांमध्ये भूजल पातळी घटल्याने उन्हाळ्यात पाणीटंचाईचे चटके बसण्याची शक्‍यता आहे. त्या पार्श्‍वभूमीवर नागरिकांना दिलासा देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कृती आराखडा तयार केला आहे. या वर्षी जिल्ह्यातील आठ तालुक्‍यांत समावेशीत गावांसाठी संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. आराखड्यानुसार १४५ गावांमध्ये उन्हाळ्यात पाणीटंचाईची स्थिती निर्माण होऊ शकते. त्यासाठी १०४ उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. संबंधित कामे हिवाळ्यात सुरू करून नागरिकांना उन्हाळ्यात पाणीपुरवठा सुरू करावा यासाठी संबंधित उपाययोजनांना जिल्हाधिकाऱ्यांकडून मंजुरी मिळाली.  ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या वतीने या उपाययोजनांची यादी होते. जिल्हा प्रशासनाने याला मंजुरी दिल्यानंतर हा प्रस्ताव आता शासनाला पाठविण्यात आला आहे. त्यात जानेवारी ते मार्च २०२० या तीन महिन्यांतील तीव्र पाणीटंचाई दूर करण्यासाठी एकूण प्रस्तावित १४५ गावांसाठी १०४ उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. या उपाययोजनांना २ कोटी ६९ लाख ७८ हजार रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यामध्ये आर्वी तालुक्‍यातील २८ गावांसाठी ४८ उपाययोजना, आष्टी तालुक्‍यातील २३ गावांसाठी ३०, कारंजा तालुक्‍यातील ४९ गावांसाठी ६९, सेलू तालुक्‍यातील २ गावांसाठी ४, हिंगणघाट तालुक्‍यातील १० गावांसाठी १२, समुद्रपूर तालुक्‍यातील ३३ गावांसाठी ३५ उपाययोजनांचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Rain : वादळी पावसाने टोमॅटो, मिरची, भेंडीसह ऊस पीक उद्धवस्त, नुकसान भरपाई मिळणार कधी?

Konkan Ranmeva : कोकणच्या रानमेव्यावर वातावरणाचा परिणाम, अनेकांचे आर्थिक गणित कोलमडणार

Agrowon Podcast : हळदीचे भाव तेजीतच; कापूस, सोयाबीन, गहू, लिंबू यांचे काय आहेत दर पाहुयात?

Ethanol Production : कांदा उत्पादकांच्या पाठोपाठ ऊस उत्पादकांनाही सरकारनं घोषणा करून भूलवलं ? | शेतीच्या बातम्या

Maharashtra Rain : राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा; देशातील अनेक भागात तापमानाचा पारा ४२ ते ४६ अंशाच्या दरम्यान

SCROLL FOR NEXT