सत्ता मिळाली तर शेतकऱ्यांची कर्जमाफी ः राहुल गांधी
सत्ता मिळाली तर शेतकऱ्यांची कर्जमाफी ः राहुल गांधी 
मुख्य बातम्या

सत्तेवर आल्यास गुजरातमध्येही शेतकऱ्यांची कर्जमाफी ः राहुल गांधी

पीटीआय

सुरेंद्रनगर, गुजरात : शेतकरी हित लक्षात घेऊन कर्नाटक आणि पंजाब येथील कॉंग्रेस सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. परिणामी उत्तर प्रदेशसारख्या भाजपशासित राज्यालाही आमच्या दबावामुळे कर्जमाफीची घोषणा करावी लागली आहे. शेतकऱ्यांच्या कल्याणाप्रती आम्ही जागरूक असून सत्तेवर आल्यास गुजरातमध्येही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, असे आश्वासन कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी (ता. २७) चोटीला येथे दिले.

गुजरातमध्ये राहुल यांचा तीन दिवसांचा दौरा सुरू आहे. बुधवारी चोटीला येथे राहुल यांनी ग्रामीण जनतेला संबोधित केले. राहुल म्हणाले, की विकासाला येथे काय झाले आहे. खरे तर विकासच वेडा झाला आहे. सरकारला शेतकरी आणि ग्रामीण जनतेशी काहीही देणेघेणे नाही. आम्ही कॉंग्रेसशासित राज्यांमध्ये शेतकरी कर्जमाफी केली. तसेच इतर राज्यांमध्येही असा निर्णय व्हावा यासाठी सरकारवर दबाव तयार केला.

यामुळे उत्तर प्रदेशसारख्या भाजपशासित राज्यालाही कर्जमाफी करावी लागली. पंतप्रधान म्हणताहेत की हजारो कोटींचे गुंतवणूक करार केले आहेत. प्रत्यक्षात स्थानिक पातळीवर याचा मागमूसही दिसत नाही. ही परिस्थिती बदलण्याची गरज आहे. शेतकरी हितासाठी कॉंग्रेस शेतीविरोधी धोरणांचा कायम विरोध करणार असून निवडणुकानंतर सत्तेत आलो तर गुजरातमध्येही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू. टि्वटरवरूनही हल्लाबोल 'लेडीज अँड जंटलमन, मी विमानाचा को-पायलेट आणि अर्थमंत्री बोलत आहे. कृपया आपला सीट बेल्ट घट्ट बांधून घ्या. जागेवर बसून राहा. कारण आपल्या विमानाचे पंख गळून पडले आहेत', अशा शब्दांत राहुल यांनी टि्वटरवरून हल्लाबोल केला आहे. बुधवारी भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे अर्थव्यवस्था ढासळत असल्याची टीका केली होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Delhi Farmers' protest : भाजपच्या उमेदवारांविरोधात पंजाबमध्ये शेतकऱ्यांचा रोष वाढला; एसकेएमचा विरोध कायम

Lok Sabha Constituency : कोल्हापूर जिल्ह्यातील ३७ लाख ५० हजार मतदारांचा कौल कोणाला? मतदान केंद्रे सज्ज

Fire in Nainital : उत्तराखंडच्या जंगलातील आग पोहचली शेताच्या बांधावर, एका महिलेचा होरपळून मृत्यू

Animal Ear Tagging : ...अन्यथा भरपाई अन् अनुदान नाही

Sunburn Crop : कोवळी रोपे वाचविण्यासाठी शेतकरी सरसावला

SCROLL FOR NEXT