जत तालुक्यातील ४२ गावांना पाणी देण्यास कर्नाटक सकारात्मक
जत तालुक्यातील ४२ गावांना पाणी देण्यास कर्नाटक सकारात्मक 
मुख्य बातम्या

जत तालुक्यातील ४२ गावांना पाणी देण्यास कर्नाटक सकारात्मक

Abhijeet Dake

सांगली ः जत तालुक्‍यातील ४२ गावांतील पाणीप्रश्‍न सोडविण्यासाठी कर्नाटक राज्याने सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यामुळे कर्नाटक राज्यातील तुबची बबलेश्‍वर उपसा सिंचन योजनेतून या ४२ गावांना पाणी दिले जाणार आहे. याबाबत दोन्ही राज्यांतील पाटबंधारे विभागाने सर्वेक्षण केले असून वरिष्ठ पातळीवर बैठकाही घेतल्या जात आहेत, अशी माहिती पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी दिली. जत तालुक्‍यातील ४२ गावांना म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतून पाणी देणे शक्‍य नाही. त्यामुळे अनेक वर्षांपासून या गावातील शेतीला पाणी मिळावे, अशी मागणी या गावातून होते आहे. त्यासाठी आघाडी सरकारने पुढाकार घेतला होता. मात्र, मध्यंतरीच्या काळात याबाबत ठोस पावले उचलली गेली नव्हती. त्यामुळे या गावांना पाणी मिळणे कठीण झाले होते. पाणीटंचाईमुळे या गावांतील शेतकऱ्यांनी स्थलांतर करू अशी भूमिका घेतली होती. या पार्श्‍वभूमीवर सरकारने याबाबत बैठका घेतल्या. सांगली पाटबंधारे विभागात गेल्या महिन्यात कर्नाटक राज्यातील पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांनी जून २०१७ मध्ये कर्नाटक राज्यातील प्रकल्पांना भेटी दिल्या. कृष्णा नदीवरील तुबची बबलेश्‍वर उपसा सिंचन योजना व त्याची वितरण प्रणाली ही जत तालुक्‍यातील वंचित गावांच्या जवळ आहे. या योजनेच्या शेवटच्या टिकोटा वितरणापासून जत सीमा अंतर सुमारे १० किलोमीटरचा आहे. त्यामुळे जत पूर्व भागातील गावांना तिकोटा वितरणापासून पाणी देणे शक्‍य असल्याचा प्राथमिक अंदाज पाटंबधारे विभागाचा आहे. त्यामुळे सांगली पाटंबधारे विभाग आणि कर्नाटक पाटबंधारे विभागाची सांगली येथे  बैठक झाली.  याबाबबत सकारात्मक चर्चा झाली. त्यामुळे या गावातील पाणीप्रश्‍न सुटण्यास मदत होईल. सध्या कर्नाटक राज्यात निवडणुका आहेत. त्यामुळे या ४२ गावांना पाणी देण्यासाठी कायदेशीर करार झालेला नाही. हा कायदेशीर करार लवकरच होईल, असा विश्‍वास सांगलीच्या पाटबंधारे विभागाला आहे.  कर्नाटक राज्याने पावसाळ्यात ४ टीएमसी पाणी जत तालुक्‍यातील ४२ गावांना द्यावे. त्याबदल्यात महाराष्ट्र राज्याने उन्हाळ्यात त्यांना तेवढेच पाणी द्यावे, असा दोन्ही राज्यांमध्ये सामंजस्य करार झाला तर कायमस्वरुपी पाणीप्रश्‍न मिटण्यास मदत होईल. त्यासाठी दोन्ही राज्याने असा करार करण्यासाठी पुढे आले पाहिजे.

असे दिले जाणार पाणी कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमेवर असलेले तुबची बललेश्‍वर उपसा सिंचन योजनेतून जत तालुक्‍यातील धुळकरवाडी येथील तलावात पाणी देण्याचे नियोजन आहे. या तलावातून सुमारे २४ गावांना पाणी मिळणार आहे. त्यासाठी कर्नाटकच्या तुबची बललेश्‍वर उपसा सिंचन योजनेतून जुलै ते नोव्हेंबर म्हणजेच पावसाळ्यात नदीतून वाहून जाणारे ४ टीएमसी पाणी हे जत तालुक्‍यात देण्यात येईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Rain : वादळी पावसाने टोमॅटो, मिरची, भेंडीसह ऊस पीक उद्धवस्त, नुकसान भरपाई मिळणार कधी?

Konkan Ranmeva : कोकणच्या रानमेव्यावर वातावरणाचा परिणाम, अनेकांचे आर्थिक गणित कोलमडणार

Agrowon Podcast : हळदीचे भाव तेजीतच; कापूस, सोयाबीन, गहू, लिंबू यांचे काय आहेत दर पाहुयात?

Ethanol Production : कांदा उत्पादकांच्या पाठोपाठ ऊस उत्पादकांनाही सरकारनं घोषणा करून भूलवलं ? | शेतीच्या बातम्या

Maharashtra Rain : राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा; देशातील अनेक भागात तापमानाचा पारा ४२ ते ४६ अंशाच्या दरम्यान

SCROLL FOR NEXT