जालना : शेतीचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी गृह विज्ञान तज्ज्ञांना अधिक जोमाने काम करावे लागेल. आपल्या कामात शास्त्रीय दृष्टिकोन अंगीकारून आपली क्षमता सिद्ध करावी लागेल. निती आयोगाद्वारे देशभरातील कृषी विज्ञान केंद्रांचे मूल्यमापन केले जात असल्याचे भारतीय कृषी संशोधन परिषदेचे सहायक उपमहानिदेशक (कृषी विस्तार) डॉ. व्ही. पी. चहल यांनी स्पष्ट केले.
खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्रात कृषी तंत्रज्ञान वापर संशोधन संस्था (अटारी) पुणे आणि कृषी विज्ञान केंद्राच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील कृषी विज्ञान केंद्रात कार्यरत असलेल्या गृह विज्ञान तज्ज्ञांचे तीन दिवसांचे क्षमता बांधणी प्रशिक्षण नुकतेच आयोजित केले गेले. त्याच्या उद्घाटनपर सत्रात डॉ. चहल बोलत होते.
अध्यक्षस्थानी प्रकल्प संचालक विजयअण्णा बोराडे, तर अटारी पुणेचे संचालक डॉ. लाखन सिंग, परभणी येथील गृहविज्ञान महाविद्यालयाच्या सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ. हेमांगिनी सरंबेकर, कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख एस. व्ही. सोनुने यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. या प्रशिक्षणात राज्यभरातून आलेल्या २७ प्रशिक्षणार्थींचा सहभाग आहे.
डॉ. चहल म्हणाले, भविष्यात महिलांसाठी नारी वाटिका, संपदा यांसारखे महत्त्वाकांक्षी उपक्रम शासन आखत आहे. तसेच जालन्याच्या कृषी विज्ञान केंद्रासह, पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन, सीड हब आदीसंदर्भातील काम चांगले असल्याचे ते म्हणाले.
या वेळी दिल्ली येथील डॉ. उमा माहेश्वर राव, गृहविज्ञान महाविद्यालयाच्या विभागप्रमुख डॉ. विजया नलावडे, हैदराबाद विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. राजेंद्र रेड्डी यांचीही या वेळी प्रामुख्याने उपस्थिती होती.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.