अवकाळीने धास्ती वाढली; पावसाने पिकांना फटका
पुणे : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या वादळसदृश स्थितीमुळे राज्यात उन्हाळ्यात पावसाळी वातावरण तयार झाले आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गुरुवारपासून ढगाळ हवामानासह कमी-अधिक अवकाळी पाऊस पडत आहे. तर विदर्भात शुक्रवारी (ता. १६) सकाळपासून पावसाला सुरवात झाली होती. पाऊस आणि ढगाळ हवामानामुळे काढणीस आलेल्या गहू, ज्वारी, हरभरा, कांदा, करडई या रब्बी पिकांसह, भाजीपाला पिके आणिा बहरात असलेल्या आंबा, काजू, काढणी सुरू असलेल्या द्राक्ष बागांना फटका बसला आहे. अवकाळी पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती असल्याने शेतकरी धास्तावले आहेत.
सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांत ढगाळ हवामानसह पाऊसवाढलेली आद्रता व दुपारचे तापमान आंबा आणि काजू पिकांना मारकहंगामाच्या सुरवातीलाच ‘ओखी’ वादळामुळे मोहराचे व कोवळ्या फळांचे नुकसान.फळधारणेवर परिणाम, कीड रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता.काढणीस आलेल्या फळावर पाणी साचून बुरशी येण्याची, फळे डागाळण्याची भीतीदमट हवमानामुळे करपा, ढगामुळे ढेकण्या किडीचा प्रादुर्भाव होणार. मध्य महाराष्ट्रात रब्बी पिकांना धास्ती
पुणे, नगर, सातारा, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यांत दिवसभर ढगाळ हवामान, तुरळक ठिकाणी हलका पाऊस.पुणे जिल्ह्यातील मावळ, मुळशी, हवेली तालुक्यात शिडकावा.नगर जिल्ह्यामध्ये नगरसह कोपरगाव, अकोले, राहता, राहुरी, शेवगाव, श्रीगोंदा तालुक्यांमध्ये पावसाची रिमझिम.काढणीस असलेल्या गहू, कांदा पिकांचे नुकसान होण्याची धास्ती.पिके झाकण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरु आहे.भाजीपाल्यावर रोगांचा प्रादुर्भाव होणार.पुणे, नगरमधील, सांगलीत द्राक्षांचे नुकसान होण्याची भीती. मराठवाड्यात गारपिटीनंतर अवकाळीने चिंता
मराठवाड्यात विदर्भात फेब्रुवारी महिन्यात झालेल्या गारपिटीनंतर पुन्हा अवकाळीने चिंता वाढली.गारपिटीने यापूर्वीच जवळपास १ लाख ४७ हजार हेक्टरवरील कोरडाहू, बागायती व फळपिकांचे नुकसानअनेक जिल्ह्यांत ढगाळ हवामान, औरंगाबाद, जालना, बीड, नांदेड, परभणी, हिंगोलीत पाऊस.अवकाळी पावसामुळे कापणी केलेल्या पिकांचे भिजून नुकसान.पावसाच्या शक्यतेने हातातोंडाशी आलेला घास हिरवला जाण्याची भीती.पीक काढून घेण्यासाठी, काढलेला माल झाकण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग.रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा, करडई, हळद पीक अडचणीत विदर्भात संत्रा, आंबा, रब्बी पिके संकटात
फेब्रुवारी महिन्यातील गारपिटीने, तसेच सध्याच्या अवकाळीने रब्बी संकटात.सर्वत्र ढगाळ हवामान, अमरावती, वर्धा, नागपूरमध्ये हजेरीअकोला, बुलडाणा, वाशीममध्ये पावसाचा शिडकावाढगाळ वातावरणामुळे भाजीपाला, टोमॅटो, संत्रा, आंब्याचा मोहोर गळाला.पिकांवर रोग किडींच्या प्रादुर्भाव होण्याची शक्यतापावसाच्या भीतीने वेळेआधीच गहू काढण्यासाठी शेतकऱ्यांची लगबगबाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणलेला माल भिजला.