मुख्य बातम्या

कांदाप्रश्नी आता पुन्हा `ट्विटर’ आंदोलन 

टीम अॅग्रोवन

नाशिक: लॉकडाऊन सुरू असल्याने सध्या अनेक बाजार समित्या बंद असून कांद्याला प्रतिकिलो ५ रुपये असा सर्वसाधारण दर मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही वसूल करणे अवघड झाले आहे. या परिस्थितीत कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी केंद्राने प्रति २० रुपये किलोप्रमाणे कांदा खरेदी करावा या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेने ‘ट्विटर’ आंदोलन छेडले आहे. 

सध्या जमावबंदी असल्याने थेट रस्त्यावर उतरणे व आंदोलन करण्यास अडचणी आहेत. त्यामुळे राज्यातील कांदा उत्पादकांनी आंदोलनाची स्मार्ट पद्धत अवलंबून सरकारचे याकडे लक्ष वेधले जाणार आहे. यापूर्वी संघटनेने निर्यात खुली करण्याबाबत अशा पद्धतीने आंदोलन केले होते. आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर, वाणिज्य मंत्री पियुष गोयल, अन्न व नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान व नितीन गडकरी यांना लक्ष केले जात आहे. 

मागील वर्षाच्या खरीप हंगामापासून कांदा उत्पादक अडचणीत आहेत. खरिपाच्या तोंडावर हातात भांडवल नसल्याने कांदा विक्रीसाठी आणला जात आहे, मात्र त्यातून उत्पादन खर्चही वसूल होत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. बाजार समित्याही बहुतांशी बंद आहेत. अशा स्थितीत राज्यातील कांदा उत्पादकांनी कांदा विक्री कसा करायचा याबाबत मोठी समस्या निर्माण झालेली आहे. त्यामुळे या विषयावरही लक्ष द्या, ही भूमिका घेऊन पंतप्रधान, मुख्यमंत्री, कृषिमंत्री यांना ट्विट टॅग करण्यात येत आहे.  ट्रेंड सुरू  महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने ट्विटरवर कांदा दरवाढीसाठी आंदोलन सुरू केले आहे. या माध्यमातून #purchaseonionsupportfarmers हा हॅशटॅग ट्रेंडिंग केला जातोय. नाशिक, नगर, धुळे, जळगाव जिल्ह्यातील कांदा उत्पादक यात सहभागी होत आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT