मराठवाड्यात तुती लागवडीचा श्रीगणेशा
मराठवाड्यात तुती लागवडीचा श्रीगणेशा 
मुख्य बातम्या

मराठवाड्यात तुती लागवडीस प्रारंभ

टीम अॅग्रोवन

औरंगाबाद : रेशीम विकासासाठी तुती लागवड महत्त्वाची अाहे. त्यासाठी ३७०० एकराचे उद्दिष्ट मिळालेल्या मराठवाड्यात १० हजार ८८५ एकराची नोंदणी झाली आहे. तुती लागवडीसाठी ४ कोटी ८६ लाख ८२ हजार रोपांची निर्मिती करण्यात आली असून, महारेशीम अभियानात नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनी लागवडीसाठी अपेक्षित पाऊस व सिंचनाची सोय असलेल्या भागात तुती लागवडीचा श्रीगणेशा केला आहे.

रेशीम उद्योगाने मराठवाड्यातील दुष्काळ व नैसर्गिक आपत्तीच्या झळा सहन करणाऱ्या शेतकऱ्यांना सुरक्षित व शाश्वत उत्पादन व उत्पन्नाचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेल्या रेशीम उद्योगावाच्या विस्ताराचे काम रेशीम विभागाने राबविलेल्या महारेशीम अभियानातून झाले आहे. राज्यात रेशीम उद्योगाच्या विस्तारासाठी देण्यात आलेल्या तुती लागवडीच्या उद्दिष्टात मराठवाड्यात ३७०० एकरावर तुतीची लागवड होणे अपेक्षित होते. परंतु अपेक्षेच्या तुलनेत मराठवाड्यात क्षेत्र नोंदणीला शेतकऱ्यांनी उदंड प्रतिसाद दिला.

महारेशीम अभियानात नोंदणी केल्यानंतर तीन एकरांसाठी रोपनिर्मिती सुरू केली. जवळपास पंधरा हजार रोपांची निर्मिती झाली. नैसर्गिकरीत्या होणारी मर व एकराप्रमाणे लागणारी रोपे उपलब्ध करून लागवड करतो आहे. - शहादेव ढाकणे, शेतकरी, देवगाव, ता. पैठण, जि. औरंगाबाद.

महारेशीम अभियानाला उदंड प्रतिसाद मिळाला. उद्दिष्टाच्या तुलनेत दुप्पटीपेक्षा जास्त रोपांची निर्मिती झाल्याने उपलब्ध रोपांच्या माध्यमातून प्रतीएकर ५५०० रोपे लक्षात घेता ८८८६ एकरांवर तुती लागवड अपेक्षित आहे. नोंदणी केल्यानुसार उर्वरित शेतकरीही काडी किंवा रोपांची उपलब्धता करून तुतीची लागवड करतील, अशी आशा आहे. - दिलीप हाके, सहायक संचालक (रेशीम), औरंगाबाद

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sadabhau Khot : 'आधी कडकनाथवर बोला', भर सभेत शेतकऱ्यांचा सदाभाऊ खोतांना सवाल

Onion Export Ban : केंद्र सरकारच्या चलाखीमुळे कांदा निर्यातीवरील लगाम कायम; शेतकऱ्यांना कितीपत फायदा होणार?

Kolhapur Water Shortage : गावांना टँकरद्वारे पाण्याची गरज, लोकप्रतिनिधी, प्रशासन निवडणुक कामात व्यस्थ

Agriculture Industry : उद्योगाच्या घरी रिद्धी-सिद्धी...

Success Story : अल्पभूधारकांच्या शेतात फुलली हिरवाई

SCROLL FOR NEXT