बीजोत्पादन क्षेत्र नोंदणीला मुदतवाढ
बीजोत्पादन क्षेत्र नोंदणीला मुदतवाढ 
मुख्य बातम्या

बीजोत्पादन क्षेत्र नोंदणीला मुदतवाढ

टीम अॅग्रोवन

पुणे : राज्यात रब्बी हंगामासाठी घेतल्या जाणाऱ्या हरभरा बीजोत्पादनाच्या क्षेत्र नोंदणीची अंतिम तारीख ३० नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे.  बीज प्रमाणीकरण यंत्रणेच्या संचालकांनी नगर, परभणी, जालना, जळगाव, अकोला आणि नागपूरच्या विभागीय बीज प्रमाणीकरण अधिकाऱ्यांना गेल्या आठवड्यात मुदतवाढीबाबत कळविले आहे. त्यामुळे क्षेत्र नोंदणीची अंतिम तारिख आता २० नोव्हेंबरऐवजी ३० नोव्हेंबर अशी गृहीत धरली जाईल. ‘‘ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात झालेल्या अतिपावसामुळे ज्वारी, करडई, हरभरा या रब्बी पिकांच्या पेरणीला पोषक वातावरण मिळणार नाही. तसेच पेरणीयोग्य जमिनीच्या मशागतीची कामेदेखील रखडल्याने पेरणीला उशीर होईल, असे अहवाल विभागीय बीज प्रमाणीकरण अधिकाऱ्यांनी पाठवले होते,’’ अशी माहिती कृषी आयुक्तालयाच्या सूत्रांनी दिली.  रब्बी हंगामात येणाऱ्या ज्वारी, हरभरा, करडई या सर्व पिकांच्या बीजोत्पादन क्षेत्र नोंदणीच्या तारखेत वाढ करण्याचे प्रस्तावदेखील सादर करण्यात आले होते. त्यानुसार बीज प्रमाणीकरण संचालकांनी ज्वारी व करडईला १५ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली. आता हरभऱ्याच्या मुदतवाढीला देखील मान्यता दिली आहे.  ‘‘नोंदणीअभावी बीजोत्पादनापासून वंचित असलेले शेतकरी केवळ ५० रुपये शुल्क भरून नोंदणी करू शकतात,’’ अशी माहिती सूत्रांनी दिली. तर सोयाबीन उत्पादक शेतकरी यंदा स्वतःकडील घरगुती बियाणे वापरात मोठी वाढ करतील, असा दावा कृषी खात्याकडून केला जात आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT