sant sahitya parishad
sant sahitya parishad  
मुख्य बातम्या

संतांचे विचार कीर्तनकारांनी स्वतः आचरणात आणावे : चर्चासत्राचा सूर

टीम अॅग्रोवन

कोल्हापूरः समाजाची अभिरूची बदलत आहे त्यामुळे कीर्तनाला मनोरंजनाचा नको तितका मुलामा दिला जात आहे, त्यामुळे संतांचे विचार व त्याची फलश्रुतीचे मूल्यमापन होत नाही. त्यामुळे काही कीर्तनाला धंदेवाईक रूप येते आहे. ही चिंतेची बाब आहे यातून बाहेर पडण्यासाठी कीर्तनकारांनी संताचे विचार स्वतः आचरणात आणून कीर्तनव्दारे प्रबोधन करणे गरजेचे आहे, असा सूर ‘कीर्तन परंपरेतील व्यवहारिक रूप’ या विषयावरील चर्चासत्रात व्यक्त झाला. वारकरी साहित्य परिषदेतर्फे येथे सुरू असलेल्या आठव्या संत साहित्य संमेलनात रविवारी (ता. २९) पहिल्यासत्रात ‘कीर्तनाला आलेले व्यवहाराचे रूप’ या विषयावर नरहरीबुवा चौधरी, बाळासाहेब महाराज चोपदार, पंडीत महाराज क्षीरसागर, नामदेव आप्पा चव्हाण यांनी या चर्चासत्रात भाग घेतला. श्री. चौधरी म्हणाले की, ‘‘वारकरी संप्रदाय अथवा कीर्तनकारांवर समाजाचा विश्‍वास आहे त्यांच्या कीर्तनाला गर्दी होते म्हणून वाढदिवस किंवा कोणत्या सार्वजनिक उत्सवाचे औचित्य साधून पैसे जास्त देत कीर्तनाचे संयोजन केले जाते. तेव्हा कीर्तनाला व्यवसायिक रूप येते. तुलनेत संतांनी सांगितलेल्या मूल्य विचार कमी प्रमाणात सांगून लोकांना हसविण्यासाठी मनोरंजनात्मक गोष्टीवर भर दिला जाते. त्याला टाळ्या मिळतात गर्दी वाढते. पण, समाजजीवनात अध्यात्मिकतेचे भान कितपत जागविले याचा विचार बाजूला पडतो तेव्हा अशा कीर्तनाची फलश्रुती शून्याकडे जाते म्हणून संतांनी सांगितले त्यागाची शिकवण कीर्तनकारांनी विसरून चालणार नाही.’’ बाळासाहेब चोपदार म्हणाले, की वारकरी संप्रदायात परबंधन नाही येथे कोणीही येऊ शकते. येथे सदाचार, शुध्द व्यवहार, विनम्रता पाळता येते. त्याला नम्रताही यशाची पहिली आहे येथे शिकता येते त्यातून वाणी शुध्द होते त्यातून प्रपंच बसविता येतो. पण वाणी अशुध्द झाली तर बसलेला प्रपंच उद्‌ध्वस्तही होतो. म्हणून कीर्तनकारांनी शुध्द वाणी असावी, संताचे विचार मूल्य समाजापर्यंत निष्ठेने पोचवले पाहिजे. सायंकाळच्या सत्रात फड  विविध विभागात संत साहित्याचा प्रचार, कीर्तनामध्ये महिलांच्या सहभागाची गरज आदि विषयांवर परिसंवाद झाले. आज मान्यवरांचा गौरव संमेलनाचा सोमवारी (ता. ३०) अंतिम दिवस असून विविध मान्यवरांना वारकरी विठ्ठल पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. यामध्ये डॉ. सदानंद मोरे यांना विशेष सेवेसाठी जीवनगौरव पुरस्कार, प्रभाकर महाराज बोधल, भानुदास महाराज यादव यांचा विशेष पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. उषाताई कांबळे यांना उत्कृष्ट महिला कीर्तनकार पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Care : वाढत्या उष्णतेचा पशुधनास फटका

Public Well Policy : सार्वजनिक विहिरींच्या पुनरुज्जीवनावर धोरण काय?

Agriculture Irrigation : ‘म्हैसाळ’चे पाणी माडग्याळ शिवारात

Jalgaon Lok Sabha : ...तर जळगावचे चार खासदार पोहोचतील लोकसभेत

Banana Orchard Burn : सातपुड्याच्या पायथ्याशी केळी बागा करपल्या

SCROLL FOR NEXT