मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांत अजूनही पाणीटंचाई
मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांत अजूनही पाणीटंचाई 
मुख्य बातम्या

मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांत अजूनही पाणीटंचाई

टीम अॅग्रोवन

औरंगाबाद : मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, नांदेड हे तीन जिल्हे वगळता औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद या पाच जिल्ह्यांतील ७१७ गावे, वाड्यांना आजही पाणीटंचाईला समोरे जावे लागत आहे. या पाच जिल्ह्यांतील १५ लाख ३५ हजारांवर लोकांसमोर पाणीटंचाईचे संकट आहे. बीड जिल्ह्यात सर्वाधिक ४८१ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील ५५ गावांमधील ९१ हजार २५९ लोकांना ३८ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. जालना जिल्ह्यातील ७६ गावे, १३ वाड्यांमधील १ लाख ८१ हजार १५३ लोकांची तहान टॅंकरवर अवलंबून आहे. ९५ टॅंकरच्या साह्याने त्या ठिकाणी पाणी पुरविले जात आहे. बीड जिल्ह्यात सर्वांत जास्त पाणीटंचाईचे संकट आहे. जिल्ह्यातील २९६ गावे, १२१ वाड्यांमधील ७ लाख ८३ हजार २९२ लोकांचे पाण्यासाठी हाल सुरू आहेत. या ठिकाणी ४८१ टॅंकर सुरू आहेत. 

लातूर जिल्ह्यातील ३८ गावे, १ वाडीतील ९७ हजार ६४० लोकांना पाणीसंकटाला तोंड द्यावे लागत आहे. त्यासाठी ४१ टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील १०८ गावे, ९ वाड्यांमधील ३ लाख ८१ हजार ८९९ लोक टंचाईचा सामना करीत आहेत. २७ सप्टेंबर अखेरपर्यंत पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या गाव, वाड्यांची संख्या ८२५ होती. त्या तुलनेत ३० सप्टेबरअखेरपर्यंत टंचाईग्रस्त गावांची संख्या जवळपास १०८ ने घटल्याचे दिसते. पावसाळा संपत आला आहे. पावसाने एक दोन तालुके वगळता संपूर्ण मराठवाड्यावर दाखविलेल्या अवकृपेमुळे पाणीटंचाईचे संकट थांबत नाही, ही वस्तुस्थिती आहे. 

१६३८ विहिरींचे अधिग्रहण

पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या औरंगाबाद, जालना, बीड, लातूर व उस्मानाबाद या पाच जिल्ह्यांतील १६३८ विहिरींचे टॅंकर व टॅंकरव्यतिरिक्‍त पाणीपुरवठ्यासाठी अधिग्रहण करण्यात आले आहे. त्यात औरंगाबाद जिल्ह्यातील ११, जालना ६७, बीड ५७५, लातूर ३५०, तर उस्मानाबाद जिल्ह्यातील ६३५ विहिरींचा समावेश आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT