संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

सांगली जिल्ह्यात चिंच उत्पादन घटण्याची शक्यता

टीम अॅग्रोवन

सांगली  ः जिल्ह्यातील कवठे महांकाळ, जत, तासगाव या तालुक्यांमधील शेतकऱ्यांनी बांधावर चिंचेची लागवड केलेली आहे. परंतु, यंदा प्रतिकूल हवामानामुळे चिंचेला फळधारणा कमीच आहे. परिणामी चिंचेचे उत्पादन घटण्याची शक्यता असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

सांगली जिल्ह्यातील तासगाव व जत या तालुक्‍यांतील शेतकऱ्यांनी प्रायोगिक तत्त्वावर चिंचेची लागवड केली आहे. जत तालुक्यातील अनेक देवस्थानांच्या शेती क्षेत्रावर चिंचेची मोठ्या प्रमाणात लागवड आहे, तर अनेक शेतकऱ्यांच्या बांधावर पारंपरिक चिंचेची झाडे आहेत. 

चिंचेतून चांगले उत्पन्न मिळत असल्यानेदेखील काही शेतकऱ्यांनी चिंच लागवड केली आहे. यात देशी चिंचेची झाडे ग्रामीण भागात जास्त आहे. गेल्या काही वर्षांपूर्वी सामाजिक वनीकरण व सार्वजनिक बांधकाम विभाग रस्त्याच्या दुतर्फा चिंचेच्या झाडाची लागवड करत होते. रस्त्याकडेला अजूनही जुनी चिंचेची झाडे आहेत आणि ती फळही देत आहेत. 

या वर्षी दुष्काळग्रस्त पट्ट्यातील जत तालुक्‍यात वळीव झाला नाही. जुलै ते सप्टेंबर अखेरदेखील पुरेसा पाऊस झाला नाही. आता परतीच्या पावसाची प्रतीक्षा आहे. कमी पावसामुळे हवामान पूर्णतः कोरडे होते. वातावरणात आर्द्रतेचे प्रमाण खूपच कमी होते. तापमानही जास्त होते. यामुळे जुलै महिन्यात चिंचेला फुलोरा आला नाही. त्यामुळे फळधारणा अपेक्षित नसल्याने यंदा चिंचेच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.

दर वाढण्याची शक्यता सध्या स्थानिक बाजारात चिंचेला किमान २५ रुपये प्रतिकिलो दर आहे. चिंचोका व टरफले काढून प्रतिकिलो ७५ ते ८० रुपये दर आहेत. या चिंचेच्या झाडांना चालू वर्षी प्रतिकूल हवामानामुळे अपेक्षित फळधारणा झालेली नाही. चालू वर्षी काहीच उत्पन्न मिळणार नाही, अशी स्थिती सर्व ठिकाणी असून, चिंचेचा दर वाढण्याची शक्यता आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Delhi Farmers' protest : भाजपच्या उमेदवारांविरोधात पंजाबमध्ये शेतकऱ्यांचा रोष वाढला; एसकेएमचा विरोध कायम

Lok Sabha Constituency : कोल्हापूर जिल्ह्यातील ३७ लाख ५० हजार मतदारांचा कौल कोणाला? मतदान केंद्रे सज्ज

Fire in Nainital : उत्तराखंडच्या जंगलातील आग पोहचली शेताच्या बांधावर, एका महिलेचा होरपळून मृत्यू

Animal Ear Tagging : ...अन्यथा भरपाई अन् अनुदान नाही

Sunburn Crop : कोवळी रोपे वाचविण्यासाठी शेतकरी सरसावला

SCROLL FOR NEXT