जळगाव ः मूग, उडीद नुकसानीसंबंधी गेल्या पंधरवड्यात पंचनामे हाती घेण्यात आले. मध्यंतरी पाऊस सुरूच होता. यात सोयाबीन पकासंबंधीदेखील पंचनाम्यांची मागणी करण्यात येत होती. यामुळे सोयाबीनबाबतही सर्वेक्षण सुरू झाले आहे.
खानदेशात मुगाचे ७५ टक्क्यांवर, तर उडदाचे सुमारे ६५ टक्के नुकसान झाले आहे. ही नुकसानीची पातळी गेल्या आठवड्यातील पावसाने वाढली आहे. जळगाव जिल्ह्यातील प्राथमिक माहिती गेल्या आठवड्यातही जारी झाली होती. पुन्हा याबाबत नवी माहिती दिली जात आहे.
जळगाव जिल्ह्यात सुमारे १८ हजार हेक्टरवर मुगाचे ७५ टक्के आणि उडदाचे सुमारे १५ हजार हेक्टरवर सुमारे ६५ टक्के नुकसान झाले आहे. धुळ्यात सुमारे पाच हजार हेक्टरवर उडदाचे आणि मुगाचेदेखील १० हजार हेक्टरवर ८० टक्के, नंदुरबारात सुमारे आठ हजार हेक्टरवर मुगाचे ७८ टक्के, तर उडदाचे चार हजार हेक्टरवर नुकसान झाले आहे. काही भागात उडदाच्या नुकसानीची पातळी अधिक आहे. कारण, या भागात अधिक पाऊस होता.
सातपुडा पर्वतालगत मुगाची हानी अधिक झाली आहे. नुकसानीसंबंधी अंतिम माहिती तयार झालेली नाही. कारण उडदाचे पीक अनेक भागात उभे आहे. त्यात नुकसान होत आहे. कारण पाऊस सतत सुरू आहे. काही भागात जोरदार तर काही भागात मध्यम स्वरुपाचा पाऊस येत आहे. यामुळे मळणीवर परिणाम होत असून, पीक शेतातच पडून राहत आहे. उडदात दाणे पिवळे, लाल पडण्याचे प्रकार आर्द्रता व पावसुामुळे होत आहेत, अशी माहिती मिळाली.
सोयाबीनचे ६५ टक्के नुकसान
सोयाबीनचेदेखील अतिपावसात ६० ते ६५ टक्के एवढे नुकसान काही भागात झाल्याच्या तक्रारी शेतकरी करीत आहेत. परंतु, याबाबत पंचनामे सुरू नव्हते. शेतकऱ्यांनी लोकप्रतिनिधी व स्थानिक प्रशासनाकडे वारंवार मागणी केली. यानंतर सोयाबीनची स्थिती काय आहे, याचे सर्वेक्षण केले जात आहे. पाऊस लांबत असल्याने हे पिकही संकटात आहे. पंचनाम्यांची गरज आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.