पीकविमा प्रश्‍न आठ दिवसांत सोडवा : `स्वाभिमानी`ची मागणी
पीकविमा प्रश्‍न आठ दिवसांत सोडवा : `स्वाभिमानी`ची मागणी 
मुख्य बातम्या

पीकविमा प्रश्‍न आठ दिवसांत सोडवा : `स्वाभिमानी`ची मागणी

टीम अॅग्रोवन

सोलापूर : शेतकऱ्यांनी विमा काढावा, यासाठी केंद्र सरकार एकीकडे कोट्यवधींच्या जाहिराती करत आहे. विम्याची रक्‍कम बॅंकेत भरून देखील बॅंकांच्या चुकीमुळे, विमा कंपन्यांच्या ढिसाळ कारभारामुळे शेतकऱ्यांना सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. हा प्रश्‍न आठ दिवसांत सोडवा, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला.

स्टेट बॅंक ऑफ इंडिया, युनियन बॅंक ऑफ इंडिया आणि बॅंक ऑफ इंडिया या तीन बॅंकांच्या ढिसाळ कारभारामुळे सांगोला, पंढरपूर व माढा तालुक्‍यातील शेतकरी विम्यापासून वंचित राहिले आहेत. विमा कंपनी आणि राष्ट्रीयकृत बॅंका शेतकऱ्यांना दाद देत नाहीत. त्यामुळे निराश शेतकरी आता जिल्हाधिकारी कार्यालय व कृषी विभागाच्या कार्यालयाची वाट धरू लागले आहेत.

माढा तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी विम्याची भरलेली रक्कम परत त्यांच्या खात्यावर जमा झाल्याची तक्रार केली. ती घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष शिवाजी पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेतली.

माढा तालुक्‍यातील काही शेतकऱ्यांनी विम्याची रक्कम चुकीच्या खात्यावर भरल्याने त्यांना या योजनेचा लाभ घेता आला नाही. त्यांना या योजनेचा लाभ द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. सांगोला आणि पंढरपुरातही असेच काही प्रकार घडले आहेत, असेही त्यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT