.. तर अनेक नेत्यांना धक्का बसेल ; अण्णा हजारे ..So many leaders will be shocked; Anna Hazare
.. तर अनेक नेत्यांना धक्का बसेल ; अण्णा हजारे ..So many leaders will be shocked; Anna Hazare 
मुख्य बातम्या

.. तर अनेक नेत्यांना धक्का बसेल ; अण्णा हजारे 

टीम अॅग्रोवन

राळेगण सिद्दी, ता. पारनरे : ‘‘मी कधीही कोणताही पक्ष वा व्यक्तीच्या विरोधात आंदोलन करीत नाही. मी समाजहितासाठी आंदोलन करतो, वैयक्तीक स्वार्थासाठी नाही. आंदोलन मागे घेतल्याने माझ्यावर होणारी टीका काही मला नवीन नाही. आतापर्यंत मी सर्वच पक्षांविरोधात आंदोलने केली. अनेक राजकारणी नेत्यांच्या पोथ्या माझ्याकडे आहेत, त्या उघडल्या अनेकांना मोठा धक्का बसेल,’’ अशा शब्दांत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी टीका करणाऱ्यांना इशारा दिला. 

हजारे म्हणाले, ‘‘देशात सर्वच राज्यांत शेतमालाचा उत्पादन खर्च सारखा येत नाही. तसेच, उत्पादनही कमी-अधिक प्रमाणात असते; मग देशभरात एकच हमीभाव कसा योग्य राहील. सध्या सरकारी पातळीवर कृषी विभाग फळबाग लागवडीसाठी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून शेतकऱ्यांना झाडे, खड्डे खोदणे, खते, तसेच इतर मशागतीसाठी अनुदान, मजुरी देते. त्याच धर्तीवर देशभरातील दुष्काळग्रस्त, जिरायती भागातील शेतकऱ्यांना सरकारने शेतीची मशागत,

पीक पेरणी वा लागवडीसाठी, पिकांची काढणी वा तयारी करण्यासाठी रोजगार हमी योजनेतून शेतमजूर किंवा मजुरी देऊन मदत करणे गरजेचे आहे. तसे झाल्यास, सरकारला हमीभाव ठरविणे सोपे जाईल. जिरायती वा दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांचा उत्पादनखर्च आपोआप कमी होईल व जो हमीभाव जाहीर होईल, तो त्यांना आपोआप परवडेल.

शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होऊन खर्च कमी होईल. त्यांच्या उत्पन्नात वाढ झाल्यास पर्यायाने शेतकरी कर्जबाजारी होणार नाहीत. कर्जबाजारीपणामुळे होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबण्यास मोठी मदत होणार आहे.’’

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sadabhau Khot : 'आधी कडकनाथवर बोला', भर सभेत शेतकऱ्यांचा सदाभाऊ खोतांना सवाल

Onion Export Ban : केंद्र सरकारच्या चलाखीमुळे कांदा निर्यातीवरील लगाम कायम; शेतकऱ्यांना कितीपत फायदा होणार?

Kolhapur Water Shortage : गावांना टँकरद्वारे पाण्याची गरज, लोकप्रतिनिधी, प्रशासन निवडणुक कामात व्यस्थ

Agriculture Industry : उद्योगाच्या घरी रिद्धी-सिद्धी...

Success Story : अल्पभूधारकांच्या शेतात फुलली हिरवाई

SCROLL FOR NEXT