शिवसेनेला काम करण्याची संधी मिळायला हवी ः राजू शेट्टी
शिवसेनेला काम करण्याची संधी मिळायला हवी ः राजू शेट्टी 
मुख्य बातम्या

शिवसेनेला काम करण्याची संधी मिळायला हवी ः राजू शेट्टी

टीम अॅग्रोवन

सोलापूर : राज्यात बदलत्या समीकरणाबाबत स्वाभिमानीने काय भूमिका घ्यावी, यासाठी लवकरच राज्य कार्यकारिणीची बैठक घेणार आहे. पण भाजप सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे नाही. त्यामुळे शिवसेनेला काम करण्याची संधी मिळायला पाहिजे, असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी गुरुवारी (ता. ७) येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.  

सोलापूरच्या दौऱ्यावर आल्यानंतर शासकीय विश्रामगृहात ते पत्रकारांशी बोलले. या वेळी संघटनेचे युवक प्रदेशाध्यक्ष अमर कदम, जिल्हा संघटक विजय रणदिवे, जिल्हाध्यक्ष महमूद पटेल उपस्थित होते. 

श्री. शेट्टी म्हणाले, ‘‘केंद्र सरकारने यंदाच्या हंगामासाठी मागील वर्षीचीच ‘एफआरपी’ कायम ठेवली आहे. यंदाच्या हंगामात एकरकमी ‘एफआरपी’सोबतच त्यावर किती रुपये कारखानदारांकडून घ्यायचे? याचा निर्णय २३ नोव्हेंबरला जयसिंगपूरमध्ये होणाऱ्या ऊस परिषदेत घेतला जाणार आहे. यंदाच्या हंगामात सरासरी ऊस क्षेत्रात ५५ टक्‍क्‍यांची घट झाली आहे. साखर कारखान्यांचा हंगाम यंदा ८० ते ८५ दिवस एवढाच चालेल, असा अंदाज आहे. कर्जमाफीचा लाभ अद्यापही शेतकऱ्यांना मिळत नाही. दुष्काळानंतर अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना मिळावी, शासन फक्त घोषणाच करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.’’

स्वाभिमानीचा प्रभाव ज्या भागात आहे, त्याच भागातील जागा लढण्याचा निर्णय स्वाभिमानीने लोकसभा व विधानसभा निवडणुकीत घेतला होता. दोन्ही कॉंग्रेसच्या आघाडीतून सोलापूर जिल्ह्यातील मतदारसंघ स्वाभिमानीला मिळावा, यासाठी स्थानिक पदाधिकाऱ्यांचा फारसा उत्साह न दिसल्याने स्वाभिमानीने एकाही जागेची मागणी केली नाही, असेही स्पष्टीकरण त्यांनी दिले. पण स्वाभिमानीची ताकद आहे, ही ताकद स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत दाखवू, असेही ते म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT