शरद पवार
शरद पवार  
मुख्य बातम्या

दडपशाही थांबविण्यासाठी सत्ता परिवर्तन हवे : शरद पवार

टीम अॅग्रोवन

नगर ः ‘‘महाराष्ट्र राज्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची असून, लोकसभेत निकाल वेगळा लागला, पण विधानसभेत वेगळा निकाल लागतोय. असं कित्येकवेळा घडलेलं आहे, या वेळी तसंच घडणार आहे. राज्यातील दडपशाही थांबवण्यासाठी राज्यात बदल घडवायचा असून अकोल्यात तर बदल करून पक्षांतर करणाऱ्यांना घरी बसवा आणि धडा शिकवा’’ असे आवाहन ‘राष्ट्रवादी’चे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. राज्यात महिलांसह कोणीच सुरक्षित नसल्याचा आरोप या वेळी पवारांनी केला.   अकोले (जि. नगर) येथे रविवारी (ता.१३) ‘राष्ट्रवादी’चे उमेदवार किरण लहामटे यांच्या प्रचारासाठी शरद पवार यांची सभा झाली. अध्यक्षस्थानी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष दशरथ सावंत होते. उमेदवार किरण लहामटे यांच्यासह किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, अशोक भांगरे, सुनिता भांगरे, बाजीराव दराडे, कारभारी उगल, मारुती मेंगाळे, आबासाहेब थोरात यांची उपस्थिती होती.   श्री. पवार म्हणाले, ‘‘जवानांनी पाकिस्तावर कारवाई केल्याचा अभिमान आहे. मात्र त्यात शौर्य दाखवले जवानांनी आणि श्रेय घेतायेत मोदी. इंदिरा गांधी पंतप्रधान असतानाही पाकिस्तावर हल्ले झाले होते. त्यांनीही एतिहासिक काम केलं, पण त्याचे श्रेय कधी घेतले नाही. अनेक राज्यांत लोकसभेला आणि विधानसभेला वेगवेगळा निकाल लागलेला आहे. महाराष्ट्रात तेच घडवायचे आहे. राज्यातील अनेक भागांत उद्योगधंदे उभारले, हजारो हातांना काम दिले. अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले, किती बाबी सांगू? याची काहीही माहिती नसलेले अमित शहा विचारतात काय केले? सत्तेचा गैरवापर ठिकठिकाणी केला जातोय. कुठेही काही झालेय की दडपशाही होत आहे. आता राज्यात बदल केल्याशिवाय गत्यंतर नाही.’’ अकोल्यात तर बदल करून पक्षांतर करणाऱ्यांना घरी बसवा. पाच वर्षात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या केलेलं महाराष्ट्र राज्य आहे. कर्जमाफीची घोषणा फसवी. ३१ टक्के लोकांना दिली असेल तर ६९ टक्के लोकांचे काय? शेती आणि शेतकऱ्यांसाठी फार केल्याचे सांगत आहेत. कारखानदारीची अवस्था काय करून ठेवलीय. या साऱ्या बाबींचा विचार होणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.   मोदी, शहा काय पर्यटनाला येत आहेत? पवार म्हणाले, ‘‘मी कुस्ती परिषदेत काम केले आहे. मला सगळ्या बाबी आहेत. कुस्ती आम्ही पैलावानांशी करत असतो. मुख्यमंत्र्यांनी याची नोंद घ्यावी. येथे लढाई दिसत नाही, फक्त भाजपचा विचार मान्य केला एवढेच त्यांना दिसत असतील आणि विरोधक शिल्लक नसल्याचे वाटत असेल तर पंतप्रधान, गृहमंत्री यांची सभा कशासाठी? भंडारदरा पाहायला येतात काय, त्यांना पराभवाची जाणीव झाली आहे.’’

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

Kharif Sowing : साडेसात लाख हेक्टरवर जिल्ह्यात खरिपाचा पेरा

Shaktipeeth mahamarg : 'रस्त्यांवरच्या लढाईची शेतकऱ्यांनी तयारी करावी', शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांची एकजूठ

SCROLL FOR NEXT