Seed harvesting started in Satara district
Seed harvesting started in Satara district 
मुख्य बातम्या

सातारा जिल्ह्यात आले बियाणे काढणीस प्रारंभ

टीम अॅग्रोवन

सातारा ः आले लागवडीसाठी बियाणे काढणीस सुरुवात झाली आहे. आले दरातील झालेल्या घसरणीमुळे बियाणे काढणीही संथ गतीने सुरू आहे. गतवर्षीच्या तुलनेत ३० ते ४० टक्के आले पिकांच्या क्षेत्रात घट होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

सातारा जिल्ह्यातील ऊस, हळद या पिकांसह आले या नगदी पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात होते. सातारा, कोरेगाव, खटाव, कऱ्हाड या तालुक्यात सर्वाधिक आले पिकांची लागवड होते. मागील दोन वर्षांपूर्वी आले पिकांचे दर तेजीत आल्याने लागवड क्षेत्रात वाढ होत गेली आहे. गतवर्षीही मोठ्या प्रमाणात आले लागवड झाली होती. मात्र घातक हवामान अति पाऊस यामुळे आले पिकांस मोठ्या प्रमाणात कंदकूज झाली होती.

कंदकूज नियंत्रणात न आल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आले काढणीकडे कल वाढला होता. या वेळी एकूण क्षेत्रापैकी २० ते ३० टक्के आले काढल्याचा अंदाज आहे. मागील तीन महिन्यांत आले दरात सातत्याने घट सुरू आहे. पाच ते सहा हजार रुपये प्रमाणे प्रतिगाडीस (५०० किलो) सध्या दर मिळत आहे. हा दर खूपच कमी असून, यातून भांडवली खर्च निघणार नाही. यामुळे नवीन लागवडीसाठी बियाणे काढणीकडे शेतकऱ्यांचा कल कमी झाला आहे. नियमित लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांकडून बियाणे काढणीस सुरुवात झाली आहे.

कंदकूज प्रादुर्भाव न झालेल्या प्लॅाटमधून घेण्यावर भर फायदेशीर असल्याने शेतकऱ्यांकडून बाधित न झालेल्या प्लॅाटचा शोध सुरू आहे. विक्रीच्या दरात कमालीची घसरण झाली असल्याने बियाण्याचे दर किती कारावेत याबाबत संभ्रमावस्था आहे. सध्या प्रतिगाडी नऊ ते ११ हजार रुपये दर घेतला जात आहे. तसेच काढण्याचा खर्च खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांना करावा लागत असल्याने प्रतिगाडीस सुमारे दीड हजार रुपये खर्च येत आहे. सध्या मिळणारे दर कमी असल्याने एकूण आले पिकांच्या क्षेत्रात ३० ते ४० टक्के घट होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sadabhau Khot : 'आधी कडकनाथवर बोला', भर सभेत शेतकऱ्यांचा सदाभाऊ खोतांना सवाल

Onion Export Ban : केंद्र सरकारच्या चलाखीमुळे कांदा निर्यातीवरील लगाम कायम; शेतकऱ्यांना कितीपत फायदा होणार?

Kolhapur Water Shortage : गावांना टँकरद्वारे पाण्याची गरज, लोकप्रतिनिधी, प्रशासन निवडणुक कामात व्यस्थ

Agriculture Industry : उद्योगाच्या घरी रिद्धी-सिद्धी...

Success Story : अल्पभूधारकांच्या शेतात फुलली हिरवाई

SCROLL FOR NEXT