निवडणूक काळातही मिळणार ‘सन्मान'
निवडणूक काळातही मिळणार ‘सन्मान' 
मुख्य बातम्या

निवडणूक काळातही मिळणार ‘सन्मान'

टीम अॅग्रोवन

नागपूर  : शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये देण्यासाठी शेतकरी सन्मान योजना केंद्र शासनाने सुरू केली. ऑनलाइन पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यांत पैसे जमा करण्यात येत असले, तरी गेल्या पंधारा दिवसांत फक्त १७ हजार शेतकऱ्यांनाचा लाभ मिळाला. लोकसभा निवडणुकीसाठी लागू असलेल्या आचारसंहितेच्या काळातही हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यांत वळता होणार आहे. 

सहा हजारांची रक्‍कम तीन टप्प्यांत मिळणार आहे. प्रत्येक टप्प्यात दोन हजार रुपये खात्यात जमा होतील. दोन हेक्‍टरपर्यंत शेत जमीन असलेल्या शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ मिळेल. यासाठी शेतकऱ्यांच्या अर्ज आणि हमीपत्र भरून घेण्यात आले. 

केंद्र शासनामार्फत शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा होणार असल्याचा दावा करण्यात आला होता. ऑनलाइनरीत्या रक्कम जमा होणार असल्याने दोन, चार दिवसांत पहिल्या हप्त्याची रक्‍कम खात्यांत जमा होईल, असाही दावा करण्यात येत होता. मात्र प्रशासनाचा हा दावा फोल ठरल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात १ लाख ११ हजार शेतकऱ्यांचे अर्ज पात्र ठरविण्यात आले. त्यापैकी फक्त १७ हजार शेतकऱ्यांच्या खात्यातच रक्‍कम जमा झाली आहे. विशेष म्हणजे निवडणुकीच्या काळातही ही रक्‍कम पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. 

‘आधार'ची अडचण  सन्मान योजनेसाठी आधार क्रमांकही घेण्यात आले. आधार क्रमांकावरील आणि पासबुकवरील नावात तफावत आहे. ती फारच किरकोळ आहे. मात्र सॉफ्टवेअरमध्ये नाव मॅच होत नसल्याने अनेक अर्ज केंद्र शासनाच्या विभागाकडून परत पाठविण्यात आले. आता हे अर्ज पुन्हा दुरुस्ती करण्यात येत असल्याचे सांगण्यात येते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT