संभाजी ब्रिगेड, किसान क्रांती आंदोलनातर्फे धरणे 
संभाजी ब्रिगेड, किसान क्रांती आंदोलनातर्फे धरणे  
मुख्य बातम्या

पंचनाम्यांसाठी संभाजी ब्रिगेड, किसान क्रांती आंदोलनातर्फे धरणे 

टीम अॅग्रोवन

पुणे : नैसर्गिक आपत्ती व अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे त्वरित करावेत. शेतकऱ्यांना तत्काळ नुकसानभरपाई मिळावी, या मागणीसाठी मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड, किसान क्रांती आंदोलनातर्फे शक्रवारी (ता. १४) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्य समन्वयक शांताराम कुंजीर यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

अतिवृष्टीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, वीजबीलमाफी मिळावी, रब्बी हंगामासाठी बियाणे उपलब्ध करून द्यावे, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार रुपयांची मदत द्यावी, विम्याची रक्कम शेतकऱ्यांचा खात्यावर जमा करावी, शेतमालाला हमी भाव द्यावा आदी मागण्यांचे निवेदन महाराष्ट्राचे राज्यपाल व मुख्य सचिव यांचा देण्यात येणार असल्याचेच कुंजीर यांनी सांगितले. विशाल तुळवे, प्रदीप कणसे, प्रशांत धुमाळ, अजित कार्ले, जगजीवन काळे, हनुमंतराव मोटे आदी पदाधिकारी उपस्थित होते.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Care : वाढत्या उष्णतेचा पशुधनास फटका

Public Well Policy : सार्वजनिक विहिरींच्या पुनरुज्जीवनावर धोरण काय?

Agriculture Irrigation : ‘म्हैसाळ’चे पाणी माडग्याळ शिवारात

Jalgaon Lok Sabha : ...तर जळगावचे चार खासदार पोहोचतील लोकसभेत

Banana Orchard Burn : सातपुड्याच्या पायथ्याशी केळी बागा करपल्या

SCROLL FOR NEXT