महात्मा फुले समता पुरस्काराचे वितरण
महात्मा फुले समता पुरस्काराचे वितरण 
मुख्य बातम्या

पुरोगामी विचार पुढे नेण्याची गरज ः शरद पवार

सकाळ वृत्तसेवा

पुणे  : देशात प्रतिगामी विचार वाढविण्याचा डाव रचला जात असून, त्यातूनच मनुवाद फोफावत आहे. तो संपविण्यासाठी महात्मा जोतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांचा पुरोगामी विचार पुढे नेण्याची गरज आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले. फुले यांच्या नावाच्या पुरस्काराने खरा सन्मान झाला असल्याची भावनाही श्री. पवार यांनी व्यक्त केली.

महात्मा जोतिराव फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त पुणे येथे बुधवारी (ता. २८) अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचा ‘महात्मा फुले समता पुरस्कार’ श्री. पवार यांना प्रदान करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते पुरस्कराचे वितरण झाले. महापौर मुक्ता टिळक, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ, माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, देविसिंह शेखावत आदी  या वेळी उपस्थित होते.

श्री. पवार म्हणाले, की देशात गेल्या काही काळात ठराविक विचारांनी काम सुरू आहे. तसे वातावरण निर्माण केले जात आहे. ते घातक आहे. जातीवाद-धर्मवादाच्या नावाखाली द्वेष पसरविण्याचे काम सुरू असून, मनुवादाचे समर्थन करणारे विचार आज पुन्हा एकदा डोके वर काढत आहे. मनुवादाचा हा विचार संपविण्यासाठी समतेच्या दिशेने वळायला हवे. तसे झाल्यास देशात चांगले वातावरण असेल. मात्र त्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. मला विविध विविध पुरस्कार मिळाले. मात्र काही पुरस्कारांमागे विचार असतो. तसा या पुरस्कारामागे आहे. त्यामुळे फुले यांच्या नावाने मिळालेल्या या पुरस्काराचे समाधान आहे.

जोतिराव फुले व सावित्रीबाई फुले हे काळाच्या पुढे चालणारे दांपत्य होते. फुले यांना शेतकऱ्यांबाबत प्रचंड आस्था होती. त्यांनी शेतकऱ्यांची स्थिती जाणून त्यांच्या भावना मांडल्या. आधुनिक विचार करणारे फुले हे दूरदृष्टी असलेले समाज सुधारक होते. त्यांचा समतेचा विचार पुढे नेण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे,असे श्री. पवार म्हणाले.

महात्मा फुले यांच्या कार्यात विचार आणि धडपड होती. त्यामुळे त्यांच्या नावाचा पुरस्कार पवार यांना मिळाल्याने तो सार्थक झाला. पवार यांनी सर्वच क्षेत्रात भरीव काम केले आहे. त्यात महिलांना सन्मान वाढविण्याचे पवार यांनी केलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत. संविधानाचे रक्षण करण्याची जबाबदारी सगळ्यांची आहे. ही क्षमता पवार यांच्याकडे आहे. देशाच्या इतिहासात त्यांच्या कामाचा आवर्जून उल्लेख करावा लागेल, असे पाटील यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

Kharif Sowing : साडेसात लाख हेक्टरवर जिल्ह्यात खरिपाचा पेरा

Shaktipeeth mahamarg : 'रस्त्यांवरच्या लढाईची शेतकऱ्यांनी तयारी करावी', शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांची एकजूठ

SCROLL FOR NEXT