सांगली : पारंपरिक बियाणाला रासायनिक खताच्या मात्रेने क्षीण केले. परिणामी काळी कसदार माती सत्त्वहीन बनत गेली. त्यात पिकणारे धान्य व उत्पादकता वाढवण्याची अघोरी ईर्षा सुरू झाली. त्यातून सकसपणा, सत्त्व व शुद्धता नाहीशी झाल्याने समाजात रोगराई, विकार, कुपोषण वाढले. त्यामुळे येणाऱ्या पिढीला देशी वाणांची शेती करणे गरजेचे वाटत आहे, असे प्रतिपादन पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी केले.
खरे क्लब हाऊस येथे रविवारी (ता. ५) आयोजित भारतीय किसान संघाच्या दोनदिवसीय प्रांत अधिवेशनात त्या बोलत होत्या. श्रीमती पोपेरे म्हणाल्या, ‘‘शेतकरी पूर्वापार सेंद्रिय शेती करत होता, तोपर्यंत आरोग्य उत्कृष्ट होते. जमिनीचा अस्सल पोत नैसर्गिकरीत्या टिकवला तरच धान्य, भाजीपाला, फळात तो उतरेल. आधुनिक शेतीच्या नावाखाली घातक रसायनांचा वापर केल्याने शेतीचे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतीचे आरोग्य बिघडल्याने समाजाचे स्वास्थ्यही हरवत आहे. देशी वाण नष्ट करून निकृष्ट व सत्त्वहीन गोष्टी शेतकऱ्यांच्या माथी मारण्याचे कुटील कारस्थान सुरू आहे.’’
त्या म्हणाल्या, ‘‘बहुतांश शेतकरी संकरित बियाणांचा वापर करतात. मात्र देशी बियाणे टिकवण्यासाठी शेतकऱ्यांनीच आता पुढाकार घेणे गरजेचे आहे. तीन पिढ्यांपासून उपलब्ध देशी बियाणांची बियाणे बँक तयार केली आहे. सुमारे ५२ पिकांचे ११४ वाण संग्रही आहेत. कळसूबाई संवर्धन समिती स्थापन करून त्यामार्फत सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्याचे काम सुरू आहे.
सेंद्रिय शेतीची माहिती राज्यभर देण्यात येत आहे. कडधान्ये, तूरवर्गीय धान्ये, भातासह सर्व प्रकारचे बियाणे शेतकऱ्यांना देण्यात येते. शेणखत, जीवामृत, गांडूळ खत हा खरा उपाय असून शेतकऱ्यांनी वापर करावा. गावागावात सीड बँका स्थापन करा. शेतकऱ्यांना अस्सल वाण मिळेल.’’ बळीराम सोळंके यांनी स्वागत केले. उदय राजोपाध्ये यांनी आभार मानले.
अधिवेशनातील ठराव
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.