Rs 39 crore sanctioned for crop insurance in Solapur district
Rs 39 crore sanctioned for crop insurance in Solapur district 
मुख्य बातम्या

सोलापूर जिल्ह्यात पीकविम्यासाठी ३९ कोटी रुपये मंजूर

टीम अॅग्रोवन

सोलापूर : जिल्ह्यात खरीप पीकविमा योजनेत यंदा सुमारे दोन लाख ७० हजार ३९४ शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. दरम्यान, ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे शेतकऱ्यांचे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले. नव्या नियमानुसार विमा कंपनीला संबंधित शेतकऱ्यांनी ७२ तासांत वैयक्तिकरीत्या माहिती कळवणे अपेक्षित होते. त्यानुसार जिल्ह्यातील ४५ हजार शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली. त्यांच्या प्रक्षेत्राची पाहणीही झाली. त्यातून ३३ हजार शेतकरी प्रत्यक्ष लाभासाठी पात्र ठरले आहेत. या शेतकऱ्यांसाठी आता ३९ कोटी रुपयांची भरपाई मंजुरी झाली आहे.  

दरवर्षी कृषी विभागाकडून खरीप आणि रब्बी हंगासासाठी स्वतंत्र पीकविमा जाहीर केला जातो. यंदाच्या खरिपात जिल्ह्यात २ लाख ७० हजार ३९४ शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. जिल्ह्यासाठी भारती एक्सा विमा कंपनीकडे विम्याची जबाबदारी आहे. त्यापोटी शेतकऱ्यांसह सरकारडून १२ कोटी १४ लाख रुपये विमा हप्ताही जमा केला आहे.

या हंगामातील काही पिकांचे कापणीप्रयोग झाले आहेत. उर्वरित पुढील महिन्यात होणार आहेत.  खरिपातील तुरीसह अन्य काही पिके डिसेंबरपर्यंत निघत नाहीत. त्यामुळे या हंगामातील सर्व पिकांच्या पीककापणी प्रयोगानंतरच साधारण मार्च-एप्रिलनंतर खरिपातील पीक विम्याची भरपाई ठरते. त्यात पीककापणी प्रयोग आणि नैसर्गिक आपत्तीचे नुकसान या सगळ्या तांत्रिक गोष्टी विचारात घेऊन सामूहिकरित्या शेतकऱ्यांना विमा मंजूर होत असतो. सध्या त्याची प्रक्रिया सुरू आहे. 

सध्या व्यक्तिगत दावे केलेल्यांनाच मदत 

यंदापासून विमा योजनेत नव्याने काही बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार विमा संरक्षणाच्या काळात पाऊस वा अन्य नैसर्गिक आपत्ती आल्यास त्याच वेळी ७२ तासांच्या आत शेतकऱ्यांनी वैयक्तिकरित्या विमा कंपनीला माहिती कळवणे आवश्यक आहे. त्यानुसार यंदा ऑक्टोबरमध्येच अतिवृष्टी आणि पूरस्थितीला शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागले. नव्या नियमानुसार त्यापैकी ४५ हजार शेतकऱ्यांनी थेट विमा कंपनीकडे माहिती दिली.

विमा कंपनीच्या प्रतिनिधींकडून स्थळपाहणी होऊन आता त्यातील ३३ हजार शेतकरी लाभासाठी पात्र ठरले आहेत. त्यांच्यासाठी ३९ कोटी रुपये मंजूर केले आहेत. आता उर्वरित २ लाख २५ हजार ३९४ शेतकऱ्यांना मार्च-एप्रिलच्या प्रयोगकापणीनंतर सामूहिकरित्या विमा मिळणार आहे. पण, तो सर्वस्वी पीककापणी प्रयोगातील निष्कर्षावर आधारित असेल.

नव्या नियमानुसार वैयक्तिकरीत्या शेतकऱ्यांनी आपल्या पिकांच्या नुकसानीची माहिती ७२ तासांत विमा कंपनीला कळवायची होती. पण हे शक्य नसल्याने आम्ही मुदत वाढवून मागितली. त्यामुळेच शेतकरी संख्या वाढली. येत्या महिनाभरात ही मदत या शेतकऱ्यांना मिळेल. उर्वरित शेतकऱ्यांना सामूहिक विम्याची रक्कम पीककापणी प्रयोगाच्या निष्कर्षानंतर मार्च-एप्रिलनंतर मिळेल.  - रवींद्र माने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सोलापूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Care : वाढत्या उष्णतेचा पशुधनास फटका

Public Well Policy : सार्वजनिक विहिरींच्या पुनरुज्जीवनावर धोरण काय?

Agriculture Irrigation : ‘म्हैसाळ’चे पाणी माडग्याळ शिवारात

Jalgaon Lok Sabha : ...तर जळगावचे चार खासदार पोहोचतील लोकसभेत

Banana Orchard Burn : सातपुड्याच्या पायथ्याशी केळी बागा करपल्या

SCROLL FOR NEXT