The role of helping farmers: Shah
The role of helping farmers: Shah 
मुख्य बातम्या

शेतकऱ्यांना मदत करण्याचीच भूमिका : शहा

टीम अॅग्रोवन

लातूर : ‘‘कृषी उत्पन्न बाजार समितीने अडचणीच्या काळात वेळोवेळी शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका घेतली आहे. सध्या रब्बी पेरणीच्या कामासाठी शेतकऱ्यांना आर्थिक अडचण येवू नये, यासाठी कृषी पणन मंडळाच्या सूचनेनुसार बाजार समितीच्या वतीने शेतमाल तारण योजना सुरू केली आहे,’’ असे लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ललितकुमार शहा यांनी स्पष्ट केले.  

लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पुढाकारातून लातूर व मुरूड येथे सोयाबीन  शेतमाल तारण योजना राबविण्याला नुकतीच सुरवात करण्यात आली. शहा यांच्या  हस्ते या योजनेस प्रारंभ करण्यात आला. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक राजेंद्र वीर, बाजार समितीचे उपसभापती मनोज पाटील, संचालक संभाजी वायाळ, संचालक विक्रम शिंदे, रावसाहेब पाटील, हर्षवर्धन सवई आदींची उपस्थिती होती. 

शहा म्हणाले, ‘‘बाजार समितीच्या आवारात सोयाबीनची आवक वाढल्यानंतर भाव कमी होतात. शेतकऱ्यांना आपला सोयाबीन हा शेतमाल तारण योजनेत ठेवून आर्थिक गरज भागविता येईल. कमी दरात माल विकण्याची गरज पडणार नाही. माल तारण ठेवल्यानंतर चालु दराच्या ७५ टक्‍के रक्‍कम ६ टक्‍के दराने ६ महिन्यासाठी उचलता येईल. ही रक्‍कम २४ तासांच्या आत आरटीजीएसने शेतकऱ्यांच्या खात्यावर वळती केली जाईल. दरात वाढ झाल्यास शेतीमाल शेतकऱ्यांना विक्रीही करता येईल. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा.’’ 

लातूर बाजार समितीच्या अतिरिक्‍त एमआयडीसी व मुरूड उपबाजारपेठेत या योजनेचा प्रारंभ करण्यात आला. बाजार समितीचे प्रभारी सचिव सतीश भोसले, प्रभारी सहाय्यक सचिव बी. आर. शिंदे, अमर मोरे, दीपक पठाडे उपस्थित होते. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT