पाणी जिरवण्यासाठी नदी नांगरण्याचा प्रयोग
पाणी जिरवण्यासाठी नदी नांगरण्याचा प्रयोग 
मुख्य बातम्या

पाणी जिरविण्यासाठी नदीपात्र नांगरण्याचा प्रयोग

टीम अॅग्रोवन

अमरावती  ः भूगर्भात पाणी मुरून पातळी वाढावी, याकरिता जिल्ह्यात नदी नांगरण्याचा पथदर्शी प्रकल्प राबविला जात आहे. अचलपूर व तिवसा तालुक्‍यांत पहिल्या टप्प्यात हा प्रकल्प राबविण्यात येत असून त्याचे परिणाम अनुभवल्यानंतर पुढीलवर्षी सर्वच नद्या नांगरण्यासाठी पुढाकार घेतला जाणार आहे.

जिल्ह्यात जलयुक्‍त शिवार अभियानूान नदी, नाले खोलीकरण व रुंदीकरणाची कामे होत आहेत. याच अभियानाअंतर्गत अचलपूर तालुक्‍यात नदी नांगरण्याचे काम जेसीबीच्या सहाय्याने करण्यात आले. नदीमध्ये पाणी आल्यानंतर ते प्रवाहीत होत असताना नांगरलेल्या भागातून अधिक प्रमाणात मुरेल आणि पाणी पातळी वाढण्यास यामुळे मदत होईल, अशी प्रशासनाला अपेक्षा आहे. त्याकरिता नदीच्या दोन्ही काठा दरम्यानचा भाग सखोल नांगरला जात आहे. यामुळे पाणी पातळी वाढून पाणीसंकट दूर होण्यास मदत होईल. त्यासोबतच नदीकाठच्या गावांना पुराचा धोकाही कमी राहील. त्यामुळे ज्या ठिकाणी पाणी वाहून जाण्याचे प्रमाण अधिक आहे किंवा पुराचा धोका जास्त आहे, अशा नदीपात्रात नदी नांगरण्याची कामे तत्काळ करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी राजूरा शिवार, नारायणपूर परिसरातील जलयुक्‍त शिवार अभियानाअंतर्गत करण्यात आलेल्या कामांची पाहणी केली. या ठिकाणी सिमेंट नाला बांध घेण्यात आला आहे. या बंधाऱ्यामुळे १३९ हेक्‍टर जमिनीला फायदा होईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्‍त केला. नदी नांगरण्याचा हा प्रयोग कितपत यशस्वी होतो. त्यावरुन त्याच्या पुढील वर्षीच्या अंमलबजावणीचा निर्णय घेतला जाणार आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

Kharif Sowing : साडेसात लाख हेक्टरवर जिल्ह्यात खरिपाचा पेरा

Shaktipeeth mahamarg : 'रस्त्यांवरच्या लढाईची शेतकऱ्यांनी तयारी करावी', शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांची एकजूठ

SCROLL FOR NEXT