From the relief fund in Jalgaon 35% farmers are deprived
From the relief fund in Jalgaon 35% farmers are deprived 
मुख्य बातम्या

जळगावात मदतनिधीपासून ३५ टक्के शेतकरी वंचित

टीम अॅग्रोवन

जळगाव ः जिल्ह्यात अतिपावसात कापूस, उडीद, मूग, ज्वारी, बाजरी, सोयाबीन या पिकांची मोठी हानी झाली. सर्वच पिकांचे नुकसान ७० ते ८० टक्क्यांवर झाल्याने उत्पादन खर्च वाया गेला. पंचनामे झाले, निधीची घोषणा करण्यात आली. परंतु अद्याप निधीचे वितरण व्यवस्थित सुरू नसल्याची स्थिती आहे. 

फक्त ६५ टक्के शेतकऱ्यांच्या बँक खात्यातच मदतनिधी वितरित झाला आहे. तब्बल ३५ टक्के शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हा निधी प्राप्त झालेला नसल्याची स्थिती आहे. जळगाव, चोपडा, यावल, जामनेर, बोदवड भागातील अनेक शेतकरी या निधीसाठी तहसील कार्यालयात चकरा मारीत आहेत. प्रशासनाने हा निधी ९० टक्के शेतकऱ्यांपर्यंत वितरित केल्याचा दावा मागील पंधरवड्यात केला होता. 

जिल्ह्यात सुमारे २१ कोटी रुपये निधी सुरवातीला प्राप्त झाला होता. जिल्ह्यात कापूस पिकाचे सुमारे अडीच लाख हेक्टरमध्ये उडीद व मुगाचे सुमारे २५ हजार हेक्टरवर तर सोयाबीनचेदेखील सुमारे १४ हजार हेक्टरवर मोठे नुकसान झाले. निधी तोकडा असतानादेखील त्याचे वितरण घोषणेनुसार दिवाळीला केले नाही. गेल्या पंधरवड्यात निधी वितरण सुरू झाले. लागलीच प्रशासनाने निधी वितरणाचे दावे सुरू केले. परंतु, निधीचे वितरण अद्याप शेतकऱ्यांच्या बँक खात्यात झालेले नाही. यामुळे शेतकरी या निधीच्या प्रतीक्षेत आहेत. 

अनेक भागात तलाठी व इतरांनी बँक खाते, आधार क्रमांकातील चुका करून ठेवल्याने शेतकरी निधीपासून वंचित आहेत. तर, अनेकांची नावेच नुकसानग्रस्तांच्या यादीत नाहीत. नुकसानग्रस्तांची यादी प्रशासनाने जाहीर केलीच नाही, असा आरोपही शेतकरी करीत आहेत. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढत आहे. निधीचे वितरण शेतकऱ्यांना करावे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Export : कांदा निर्यातबंदी उठवली, मात्र निर्यात वाढणार नाही याचीही सोय केली

Indian Monsoon : पाऊसकाळ उत्तम, पुढे काय?

Bachchu Kadu : देशात धर्म नाहीतर शेतकरी संकटात, बच्चू कडूंचा विरोधकांवर 'प्रहार'

Water Scarcity : आडातच नाही, तर...

Agriculture Department : राज्याला मिळेना विस्तार संचालक

SCROLL FOR NEXT