राजू शेट्टी
राजू शेट्टी  
मुख्य बातम्या

'दावणीलाही नाही आणि छावणीत नाही; जनावरे विकण्याची वेळ'

टीम अॅग्रोवन

सोलापूर :  मागील सरकारच्या काळात छावणीत भष्ट्राचार झाला. पण म्हणून आम्ही चारा दावणीला देण्याची मागणी केली. पण दावणीलाही नाही आणि छावणीत नाही. त्यामुळे जनावरे बाजारात विकण्याची वेळ आली.​ दुष्काळी तालुक्यात पाणी आणण्याच्या निवडणुकीत नुसत्या बाता मारल्या, आता पाणी आणतो म्हणाऱ्याला तुडवा, त्यानंतर त्यांनीच पाणी मागितले पाहिजे, अशा शब्दात खासदार राजू शेट्टी यांनी मंगळवेढ्यातील पाणी प्रश्नावर जोरदार हल्लाबोल केला.  मंगळवेढा तालुक्यातील हुन्नुर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर दुष्काळी परिषदेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी जिल्हाध्यक्ष समाधान फाटे, कार्याध्यक्ष विजय रणदिवे, विष्णू बागल, अ‍ॅड. राहुल घुले, नवनाथ माने, अमोल हिप्परगी, श्रीमंत केदार, अनिल बिराजदार, विजयकुमार पाटील, तात्या सावंत, मल्लिकार्जुन भांजे, विकास पुजारी, हणमंत यमगर, विठ्ठल कोळेकर, आबा खांडेकर, भाऊसो गरंडे, नामदेव मेडीदार आदी उपस्थित होते. खासदार शेट्टी म्हणाले, कृष्णा खोऱ्यातील पाणी कर्नाटकात वाया जाते, हे पाणी अडवून या भागाला दिले. दुष्काळी तीव्रता कमी होऊ शकेल पण, पाणी आले तर शेतकरी पुन्हा आपले ऐकणार कोण? म्हणून पाणी आणण्याची इच्छा होत नाही. साडे चार वर्षांच्या काळात शेतकऱ्याला आश्‍वासनाशिवाय काहीच मिळाले नाही. त्यांची आश्‍वासनाची भाषणे ऐकून आता कंटाळा आलाय. दुष्काळ जाहीर झाल्यापासून एकही उपाययोजना केल्या नाहीत. शासन दुष्काळग्रस्त विदयार्थ्याला परीक्षा शुल्क माफ केल्याचा दावा करत असून यापेक्षा वर्षाचे शैक्षणिक शुल्क माफ करायला पाहिजे. मागील सरकारच्या काळात छावणीत भष्ट्राचार झाला. पण म्हणून आम्ही चारा दावणीला देण्याची मागणी केली. पण दावणीलाही नाही आणि छावणीत नाही. त्यामुळे जनावरे बाजारात विकण्याची वेळ आली.  बाजारात घेणाऱ्यांपेक्षा विकणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने जनावरे कमी दरात सुद्धा कोण घ्यायला तयार होईना. गोवंश हत्या बंदी कायद्यामुळे जनावराचे काय करायचे हा प्रश्‍न निर्माण झाला. पंतप्रधान मोदी यांनी दौरा आणि जाहिरातीसाठी कोट्यवधी रुपये खर्च केले. पण या भागात पाणी आणण्यासाठी पैसे नसल्याचे कारण सांगून निधी देत नाहीत.  प्रधानमंत्री फसल विमा योजनेतून अंबानी अदानी यांनी काढलेल्या विमा कंपन्यांच शेतकऱ्याला कर्जबाजारी करून गबरगंड करून ठेवल्या. त्यामुळे शेतकऱ्याला आता न्याय मिळवायचा असेल तर संघर्ष करण्याची तयारी ठेवावी लागेल. भाजपाला मदत केल्याचा पश्चात्ताप होतोय. अच्छे दिन, कर्जमाफी, दीड पट हमी भाव यांसारखे अमिषे दाखवून आणि विचित्र कायदे करून शेतकऱ्याला अडचणीत आणले, असा आरोपही त्यांनी या वेळी केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Delhi Farmers' protest : भाजपच्या उमेदवारांविरोधात पंजाबमध्ये शेतकऱ्यांचा रोष वाढला; एसकेएमचा विरोध कायम

Lok Sabha Constituency : कोल्हापूर जिल्ह्यातील ३७ लाख ५० हजार मतदारांचा कौल कोणाला? मतदान केंद्रे सज्ज

Fire in Nainital : उत्तराखंडच्या जंगलातील आग पोहचली शेताच्या बांधावर, एका महिलेचा होरपळून मृत्यू

Animal Ear Tagging : ...अन्यथा भरपाई अन् अनुदान नाही

Sunburn Crop : कोवळी रोपे वाचविण्यासाठी शेतकरी सरसावला

SCROLL FOR NEXT