डाळिंबाच्या प्रश्‍नापासून सरकारने पळ काढू नये : राजू शेट्टी
डाळिंबाच्या प्रश्‍नापासून सरकारने पळ काढू नये : राजू शेट्टी  
मुख्य बातम्या

डाळिंबाच्या प्रश्‍नापासून सरकारने पळ काढू नये : राजू शेट्टी

सकाळ न्यूज नेटवर्क

निमगाव केतकी, जि. पुणे ः सरकारच्या योजनांमुळे डाळिंबाचे उत्पादन वाढले आहे. वाढलेल्या उत्पादनाला मार्केट उपलब्ध करून देण ही सरकारची जबाबदारी असताना सरकार जबाबदारी झटकून पळ काढत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, खासदार राजू शेट्टी यांनी केला.  मागील काही महिन्यांपासून उत्पादन खर्चही निघत नसल्याने डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी बागा तोडण्यास सुरवात केली आहे. या संदर्भात शेट्टी यांच्याशी चर्चा केली असता ते म्हणाले, की सरकारने सुरवातीला लागवडीला त्यानंतर ठिबक, शेततळ्यासाठी अनुदान दिले. फळपिकाचे उत्पादन वाढावे हा सरकारचा हेतू होता. शेतकऱ्यांनी निर्यातक्षम उत्पादन घेतले. केवळ उत्पादन वाढीला प्रोत्साहन देऊन न थांबता सरकारने वाढलेल्या उत्पादनाला मार्केट उपलब्ध करून देणे आवश्‍यक आहे. ती सरकारची जबाबदारी आहे. मात्र उत्पादनात वाढ झाली की सरकार मार्केट उपलब्ध करून देण्यासाठी काहीच प्रयत्न करीत नाही. 

डाळिंबाला जागतिकस्तरावर मोठी मागणी आहे. वर्षभर निर्यातीला अनुकूल धोरण सरकारने राबविले पाहिजे. परंतु तसे होत नाही. सरकारने निर्यातीला प्रोत्साहन दिले पाहिजे. डाळिंबात अनेक औषधी गुणधर्म आहेत. कॅन्सरसारख्या आजारावर देखील ते प्रभावी ठरते. त्याची सालही वाया जात नाही. विविध प्रक्रिया उद्योग उभा राहू शकतात. उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढत असताना प्रक्रिया उद्योग उभा राहणे गरजेचे आहे. मात्र तो कुठेच उभा राहत नाहीत. सरकारने यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन व भरीव मदत केली पाहिजे. परंतु याकडे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप शेट्टी यांनी केला. 

वाढलेला खर्च व अत्यल्प भावामुळे हतबल झालेल्या इंदापूर तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी डाळिंब बागा काढण्यास सुरवात केल्याची बातमी 'सकाळ'मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर त्याची दखल आमदार दत्तात्रेय भरणे यांनी घेतली. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात डाळिंब उत्पादकांचा प्रश्‍न मांडू, असे त्यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update : अकोला, सोलापुरात हंगामातील उच्चांकी तापमान

Indian Politics : चीनवरून काँग्रेसचा मोदी सरकारवर पुन्हा हल्लाबोल

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

SCROLL FOR NEXT