जळगाव जिल्ह्यातील वाळूठेक्‍यांवरील बंदी उठविली
जळगाव जिल्ह्यातील वाळूठेक्‍यांवरील बंदी उठविली 
मुख्य बातम्या

जळगाव जिल्ह्यातील वाळूठेक्‍यांवरील बंदी उठविली

टीम अॅग्रोवन

जळगाव : नागपूर खंडपीठाने स्थगिती उठविल्याने जिल्ह्यातील वाळू गटांचा लिलाव प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला आहे. जिल्ह्यात एकूण वाळू चाळीस गटांस भूजल सर्वेक्षण विभागाने मान्यता  दिली. त्यातील सुमारे दहा वाळू गट शासकीय कामांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून जिल्ह्यातील वाळू उपशाला बंदी होती. लिलावाच्या प्रक्रियेस नागपूर खंडपीठाने स्थगिती दिली होती. यामुळे दोन-तीन महिन्यांपासून वाळू लिलावाची प्रक्रिया बंद होती. सर्वच वाळू ठेक्‍याची मुदत संपल्याचे कारण त्यामागे होते. उपसा बंदी असूनही चोरट्या पद्धतीने वाळूविक्री सुरूच होती. आता खंडपीठाने वाळू लिलाव करण्यावरील स्थगिती उठविली आहे. यामुळे आता दहा गट शासकीय कामांसाठी राखीव ठेवून उर्वरित तीस वाळू गटांचे लिलाव जिल्हा प्रशासनाला करावे लागणार आहेत.

वाळू लिलावाची लवकरच प्रक्रिया

जिल्हा प्रशासन भूजल सर्व्हेक्षण, पर्यावरण विभाग, गौण खनिज विभागांची बैठक घेणार आहे. यात किती गटांचे वाळू लिलाव करावयाचे, कोणामध्ये काय अडचणी आहेत, याबाबत माहिती जाणून घेऊन वाळू लिलाव प्रक्रिया राबविली जाणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Rain : वादळी पावसाने टोमॅटो, मिरची, भेंडीसह ऊस पीक उद्धवस्त, नुकसान भरपाई मिळणार कधी?

Konkan Ranmeva : कोकणच्या रानमेव्यावर वातावरणाचा परिणाम, अनेकांचे आर्थिक गणित कोलमडणार

Agrowon Podcast : हळदीचे भाव तेजीतच; कापूस, सोयाबीन, गहू, लिंबू यांचे काय आहेत दर पाहुयात?

Ethanol Production : कांदा उत्पादकांच्या पाठोपाठ ऊस उत्पादकांनाही सरकारनं घोषणा करून भूलवलं ? | शेतीच्या बातम्या

Maharashtra Rain : राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा; देशातील अनेक भागात तापमानाचा पारा ४२ ते ४६ अंशाच्या दरम्यान

SCROLL FOR NEXT