अकोल्यात प्रतीक्षेनंतर पावसाचे आगमन
अकोल्यात प्रतीक्षेनंतर पावसाचे आगमन 
मुख्य बातम्या

अकोल्यात पावसाचे आगमन

टीम अॅग्रोवन

अकोला : या भागात गेल्या २० पेक्षा अधिक दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. आता आगमन झाल्याने दिलासा मिळनार आहे. अकोला, वाशीम तसेच बुलडाणा जिल्ह्यात मागील तीन आठवड्यांच्या प्रतीक्षेनंतर पावसाचे आगमन झाल्याने शेतकरी थोडा आनंदी झाले. पावसाच्या दडीमुळे खरीप पिकाच्या उत्पादनवाढीवर वरवंटा फिरवून गेली आहे.

मूग, उडीद व सोयाबीन ही पिके ऐन फुलावस्थेत तर मका कणीस लागण्याच्या अवस्थेत असताना पाऊस गायब झाल्याने या पिकांचे मोठे नुकसान होण्याची स्थिती तयार झाली होती.

मागील वर्षी कापूस पिकांवर बोंड अळी आल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीन, मका, उडीद व मूग या पिकाना पसंती दिली होती. पावसाने ऐन गरजेच्या काळात उघडीप दिल्याने या वर्षी शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीच्या आशा धुळीस मिळाल्या आहे. गुरुवारी (ता. १६)  सकाळी ७ वाजेपासून बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाला सुरवात झाली. यामुळे पिकांना दिलासा मिळू शकणार आहे.

गुरुवारी सकाळपासून बऱ्यापैकी पाऊस पडत आहे. हाच पाऊस ८ ते १० दिवसांपूर्वी पडला असता, तर खरिपाची पिके हातची गेली नसती. सोयाबीन, उडीद व मूग तसेच मका पिकांना पावसाची गरज होती, त्या वेळी पाऊस नव्हता. - विशाल भाकरे, शेतकरी, कंडारी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Export Ban : केंद्र सरकारच्या चलाखीमुळे कांदा निर्यातीवरील लगाम कायम

Kolhapur Water Shortage : गावांना टँकरद्वारे पाण्याची गरज, लोकप्रतिनिधी, प्रशासन निवडणुक कामात व्यस्थ

Agriculture Industry : उद्योगाच्या घरी रिद्धी-सिद्धी...

Success Story : अल्पभूधारकांच्या शेतात फुलली हिरवाई

Onion Export : कांदा निर्यातबंदी उठवली, मात्र निर्यात वाढणार नाही याचीही सोय केली

SCROLL FOR NEXT