मुख्य बातम्या

राज्यात पावसाचा धुमाकूळ

sandeep navale

पुणे ः गेल्या दहा ते बारा दिवसांपासून परतीच्या पावसाचे मार्गक्रमण सुरू झाले. राज्यात परतीचा पाऊस दाखल झाला नाही; मात्र हवामानात बदल झाला आहे. रविवारी (ता. ८) सकाळपर्यंत राज्यातील अनेक भागांत परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला. राज्यभरात भात, सोयाबीन, मूग, उडदासह भाजीपाल्याचे नुकसान झाले, तर वीज कोसळून जवळपास वीस जणांचा मृत्यू झाला.  रविवारी सकाळपर्यंत झालेला जोरदार पाऊस व कडाडणाऱ्या विजांमुळे अनेक ठिकाणी नुकसान झाले. किन्हेरी (जि. रायगड) परिसरात वीज अंगावर कोसळून दोघांचा मृत्यू झाला. नगरमधील कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथे शेतात काम करणाऱ्या महिलेच्या अंगावर वीज पडून मृत्यू झाला तर १२ महिला जखमी झाल्या. इतर ठिकाणी दोघांचा मृत्यू झाला. सातारा जिल्ह्यातील कणूर (ता. वाई) येथे एका व्यक्तीचा वीज पडून बळी गेला. औरंगाबाद जिल्ह्यात ढाकेफळ (ता. पैठण) परिसरातील येळगंगा नदीच्या पुलावरून जात असताना एका कामगाराचा तर देवगाव रंगारी येथेही २२ वर्षांच्या तरुणाचा विजेने बळी घेतला. पैठण तालुक्यातील रहाटगाव शिवारात झाडाखाली थांबलेल्या एका महिलेवर वीज अंगावर पडून जागीच मृत्यू झाला. त्यांच्यासोबत असलेली एक महिला अत्यवस्थ असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. बीडमध्ये धारूर तालुक्यात चारदरी येथे झाडाखाली थांबलेल्या दहा जणांच्या अंगावर वीज कोसळली. त्यातील पाच जण जागीच ठार झाले असून पाच जण गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. माजलगाव तालुक्यातील लोणगाव येथे एका महिलेच्या अंगावर वीज कोसळली. जालना जिल्ह्यातील धोपटेश्वर गावात शेतात काम करत असलेल्या एका महिलेचा वीज कोसळून मृत्यू झाला. विदर्भातील डोणगाव येथे एक व्यक्तीचा मृत्यू झाला असून तिघे जखमी झाले. भंडारा जिल्ह्यातही एका व्यक्तीचा वीज पडून मृत्यू झाला.  कोकणातील ठाणे, रायगड, पालघर, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत पाऊस झाला. त्यामुळे कोकणात काढणीस आलेल्या भाताचे नुकसान झाले. अनेक ठिकाणी भात खाचरांमध्ये पाणी साचले व पीक आडवे झाले. याचा मोठा फटका भात उत्पादकांना बसला आहे. मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नगर, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील अनेक मंडळांमध्ये पाऊस झाला. या पावसाने भाजीपाला तेसच फळबागांचे नुकसान झाले. खान्देशातील धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांमधेही अनेक ठिकाणी पाऊस झाला. मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली जिल्ह्यांत अनेक ठिकाणी पाऊस झाला. विदर्भातील बुलडाणा, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांत अनेक ठाकाणी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे काढणी केलेल्या व आलेल्या मूग, उडीद सोयाबीन, उसाचे नुकसान झाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

Kharif Sowing : साडेसात लाख हेक्टरवर जिल्ह्यात खरिपाचा पेरा

Shaktipeeth mahamarg : 'रस्त्यांवरच्या लढाईची शेतकऱ्यांनी तयारी करावी', शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांची एकजूठ

SCROLL FOR NEXT