औरंगाबाद जिल्ह्यात अखेर पाऊस बरसला
औरंगाबाद जिल्ह्यात अखेर पाऊस बरसला 
मुख्य बातम्या

औरंगाबाद जिल्ह्यात अखेर पाऊस बरसला

टीम अॅग्रोवन

औरंगाबाद  : पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यावर अखेर शुक्रवारी (ता. २२) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत पावसाची कृपा झाली. औरंगाबाद जिल्ह्यातील ५७ मंडळांत पावसाने हजेरी लावली. यापैकी तीन मंडळांत ९० मिलिमीटर पाऊस झाला. तर उस्मानाबाद जिल्ह्यातील तेरखेडा मंडळात ७२ मिलिमीटर पाऊस झाला. या पावसामुळे पेरणीची मंदावलेली गती वाढण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील ६५ पैकी ५७ मंडळात शुक्रवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत पावसाने हजेरी लावली. त्यापैकी १५ मंडळांत काही ठिकाणी २५, तर काही ठिकाणी ६४ मिलिमीटरपर्यंत पाऊस पडला. तर २७ मंडळांत काही ठिकाणी १०, तर काही ठिकाणी २३ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. १५ मंडळांत तुरळक ते हलका पाउस पडला. जोरदार पावसामुळे जलसंधारणाची अनेक कामे तुडुंब झाली. तर नाल्यांना व ओढ्यांना खळखळून पाणी वाहले.

औरंगाबाद तालुक्‍यातील औरंगाबाद मंडळात ६२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यापाठोपाठ उस्मानापूरा ३३, भावसिंगपुरा १६, लाडसावंगी १८, करमाड १२, वरूडकाझी २५, फुलंब्री तालुक्‍यातील फुलंब्री १८, पैठण तालुक्‍यातील पाचोड ४७, विहामांडवा १९, नांदर ३३, ढोरकीन १८, सिल्लोड तालुक्‍यातील सिल्लोड व अजिंठा मंडळांत प्रत्येकी १७, सोयगाव तालुक्‍यातील बनोटी मंडळात ४३, वैजापूर तालुक्‍यातील वैजापूर ३४, शिवूर २५, खंडाळा १८, महालगाव ६४, लाडगाव ४२, लासूरगाव १६, नागमठाण १९, गंगापूर तालुक्‍यातील गंगापूर ४४, वाळूज १८, शेंदूरवादा १५, सिद्धनाथवडगाव ५२, हर्सूल १५, तुर्काबाद ३२, कन्नड तालुक्‍यातील कन्नड २६, चिकलठाणा १८, देवगाव रंगारी ३०, नाचनवेल २३, खुलताबाद तालुक्‍यातील बाजारसावंगी मंडळात  १९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्‍यात सरासरी १४.८० मिलिमीटर, भोकरदन तालुक्‍यात सरासरी १५ मिलिमीटर, हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली तालुक्‍यात सरासरी १६.७१ मिलिमीटर, नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्‍यात १५.४३ मिलिमीटर, बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्‍यात सरासरी १५.७१ मिलीमीटर, लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्‍यात १२.४३ मिलीमीटर, उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद तालुक्‍यात १०.७५ मिलिमीटर, वाशी तालुक्‍यात सरासरी ३१.६७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

वीज पडून आठ जणांचा मृत्यू, तीन जखमी मराठवाड्यातील नांदेड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांत गुरुवारी (ता. २१) दुपारनंतर विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. या पावसादरम्यान वीज पडून आठ जण मृत्युमुखी पडले, तीन जण जखमी झाल्याची प्रशासनाच्या सूत्रांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Export Ban : केंद्र सरकारच्या चलाखीमुळे कांदा निर्यातीवरील लगाम कायम

Kolhapur Water Shortage : गावांना टँकरद्वारे पाण्याची गरज, लोकप्रतिनिधी, प्रशासन निवडणुक कामात व्यस्थ

Agriculture Industry : उद्योगाच्या घरी रिद्धी-सिद्धी...

Success Story : अल्पभूधारकांच्या शेतात फुलली हिरवाई

Onion Export : कांदा निर्यातबंदी उठवली, मात्र निर्यात वाढणार नाही याचीही सोय केली

SCROLL FOR NEXT