करडा कृषी विज्ञान केंद्रात रब्बी कृषी मेळावा
करडा कृषी विज्ञान केंद्रात रब्बी कृषी मेळावा 
मुख्य बातम्या

करडा कृषी विज्ञान केंद्रात रब्बी कृषी मेळावा

टीम अॅग्रोवन

अकोला ः परतीच्या पावसाने खरीप पिकांचे अतोनात नुकसान केले आहे. वाशीम जिल्ह्यात या पावसामुळे सोयाबीन, हळद, भाजीपाला व फळपिकांना मोठा फटका बसला. मशागतीची कामे लांबल्यामुळे रब्बी हंगामातील पूर्व तयारी लांबली आहे. ही बाब लक्षात घेत रब्बी हंगामात लागवड तंत्राचे मार्गदर्शन करण्यासह पावसामुळे उद्भवलेल्या विविध पीक समस्यांचे निराकरण करण्याकरिता करडा कृषी विज्ञान केंद्रांच्या वतीने सोमवारी (ता. ११) रब्बी कृषी मेळावा व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रगतिशील शेतकरी मारोतराव लादे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून कृषी संशोधन केंद्राचे  प्रभारी अधिकारी डॉ. विकास गौड, कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. आर. एल. काळे, विषय तज्ज्ञ आर. एस. डवरे, एन. बी. पाटील, टी. एस. देशमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. प्रास्ताविकात डॉ. काळे यांनी रब्बी मेळाव्याचे महत्त्व पटवून सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यांनी करावयाच्या उपाययोजनांबद्दल माहिती दिली. मानवी आरोग्य व शेतीचे आरोग्य अबाधित राखण्याकरिता एकात्मिक शेती पद्धती कशी फायदेशीर आहे हे पटवून दिले. अध्यक्षस्थानावरून मारोतराव लादे यांनी मेळाव्याच्या आयोजनामुळे अत्यंत उपयुक्त तंत्रज्ञान विषयी माहिती मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. डॉ. गौड यांनी रब्बी ज्वारी घेण्याचे फायदे, बीज प्रक्रियेचे महत्त्व, नवीन सुधारीत वाण, पेरणीचा कालावधी याविषयी माहिती देत शेतकऱ्यांनी ओवा, कोथिंबीर, जवस या पिकाच्या लागवडीचा सुध्दा विचार करावा असे सांगितले. जवस व करडई तेलाच्या विक्री करिता लाकडी तेल घाणा पद्धतीचा वापर सोयीचा व अधिक नफा देणारा ठरत असल्याचे सुचविले.  कीटकशास्त्रज्ञ डवरे यांनी अवकाळी पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत हळद पिकात कंदमाशीचे व्यवस्थापन तसेच तुरीचे कीड व्यवस्थापन आणि वाण बदल, कामगंध सापळे, पिकांची फेरपालट या विषयी सविस्तररित्या तांत्रिक माहिती दिली. टी. एस. देशमुख यांनी रब्बी पिकाचे सुधारीत लागवड तंत्राबद्दल बोलताना काबुली हरभरा, सरी वरंबा पध्दत, खत व्यवस्थापन व विद्यापीठाच्या शिफारशीत तंत्राची माहिती दिली.  एन. बी. पाटील यांनी हळदीच्या विविध वाणाचे प्रयोग व मिळालेल्या उत्पन्नाबाबत माहिती देताना सिंचन व्यवस्थापनाचे महत्त्व व एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन पद्धतीचा वापर करणे सुचविले. तांत्रिक सत्रानंतर शेतकऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरे शास्त्रज्ञांनी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून एस. के. देशमुख यांनी आभार मानले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Delhi Farmers' protest : भाजपच्या उमेदवारांविरोधात पंजाबमध्ये शेतकऱ्यांचा रोष वाढला; एसकेएमचा विरोध कायम

Lok Sabha Constituency : कोल्हापूर जिल्ह्यातील ३७ लाख ५० हजार मतदारांचा कौल कोणाला? मतदान केंद्रे सज्ज

Fire in Nainital : उत्तराखंडच्या जंगलातील आग पोहचली शेताच्या बांधावर, एका महिलेचा होरपळून मृत्यू

Animal Ear Tagging : ...अन्यथा भरपाई अन् अनुदान नाही

Sunburn Crop : कोवळी रोपे वाचविण्यासाठी शेतकरी सरसावला

SCROLL FOR NEXT