pune apmc
pune apmc 
मुख्य बातम्या

पुणे बाजार समितीत आज केवळ फळे, कांदा बटाटा व्यवहार

टीम अॅग्रोवन

पुणे: लॉकडाऊनमध्ये बाजार समित्यांमध्ये भाजीपाला खरेदीसाठी मोठ्याप्रमाणावर झालेल्या गर्दीचे मुंबई, कोल्हापूर नियोजन कोलमडल्यानंतर पोलीस आणि पुणे बाजार समिती प्रशासनाने योग्य खबरदारी घेत बाजार सुरळीत सुरु केला. अडते असोसिएशनचा बंद झुगारत प्रशासनाने ५१४ भाजीपाल्याची यशस्वी विक्री करत शेतकरी आणि ग्राहकांना दिलासा दिला आहे. तर मोशी, मांजरी आणि खडकी येथील उपबाजारांसह सुमारे ८५९ भाजीपाल्याची विक्री करण्यात आली आहे. यामुळे शहरात मुबलक भाजीपाला उपलब्ध झाल्याने कृत्रिमरीत्या वाढविलेली दरवाढ नियंत्रणात आली आहे.  गर्दीमुळे कोरोनाच्या संसर्गाच्‍या भीतीमुळे गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील अडते असोसिएशन आणि कामगार संघटनांनी ३१ मार्चपर्यंत बंद पुकारला आहे. हा बंद संघटनांनी मागे घेत, कोरोना विषाणूचा फैलाव होणार नाही यासाठीच्या विविध खबरदाऱ्या घेत बाजार सुरु ठेवण्यासाठी बाजार समिती प्रशासन आणि जिल्हा प्रशासन सातत्याने विनंती केली होती. आणीबाणीच्या परिस्थिती संघटना बंद वर ठाम होत्या. यानंतर प्रशासनाने अडत्यांशिवाय बाजार समिती सुरु ठेवण्याची कठोर भूमिका घेत, आपत्ती निवारण कायद्यान्वये परवाने रद्द आणि गाळे ताब्यात घेण्याची कडक भूमिका घेतल्यानंतर काही अडते कामावर येण्यात तयार झाले. यानुसार रविवारी (ता.२९) गुलटेकडी येथील आवारात सुमारे ५१४ लहान मोठ्या वाहनांमधून भाजीपाल्याची आवक झाली होती. 

हि आवक होत असताना पोलीस आणि बाजार समिती प्रशासनाने रविवारी (ता.२९) केवळ भाजीपाला विभागच सुरु ठेवण्याचे नियोजन केले होते. तर खरेदीसाठी केवळ अ वर्ग परवानाधारक खरेदीदारांना टप्प्याटप्प्याने मुख्य प्रवेशद्वार वगळता चार क्रमांकाच्या प्रवेशद्वारातून प्रवेश देण्यात आला. यामुळे बाजारातील गर्दी नियंत्रणात राहिली व सोशल डिस्टनिंगची देखील प्रभावी अंमलबजावणी झाली. 

याबाबतची माहिती देताना प्रशासक बी.जे.देशमुख म्हणाले, ‘‘मुंबई, कोल्हापूर बाजार समितीमधील नियोजन गर्दीमुळे कोलमडल्यामुळे पुणे बाजार समिती मधील नियोजन यशस्वी करुन दाखवायचे आमच्या पुढे आव्हान होते. हे आव्हान आम्ही पोलीस उपायुक्त सुहास बावचे यांच्या समन्वयातून सुमारे १५० पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह यशस्वी करुन दाखविले. मुख्य प्रवेशद्वारावर गर्दी होऊ नये म्हणून शिवनेरी रस्त्यासह प्रमुख रस्ते पहाटे चार नंतर बंद करण्यात आले. सर्व खरेदीदारांची वाहने ४ क्रमांकाच्या प्रवेशद्वारातून सोडण्यात आली. यामुळे बाजार आवारातील अनावश्‍यक गर्दी नियंत्रणात राहिली व तातडीने भाजीपाला खरेदी करुन टेम्पो चालकांना बाहेर काढण्यात आले. गुलटेकडी मुख्य आवारासह मांजरी, मोशी आणि खडकी येथील उपबाजारात सुमारे ८५९ लहान मोठ्या वाहनांमधून भाजीपाल्याची आवक झाली होती.’’ 

‘‘रविवारी झालेल्या आवकेमुळे शहरात मुबलक भाजीपाला उपलब्ध झाला असून, कृत्रिम भाववाढ देखील कमी झाली आहे. आज (ता.३०) भाजीपाला विभाग बंद राहणार असून, फळे आणि कांदा बटाटा विभाग सुरु होऊन, आजच्या सारखेच नियोजन करुन, शहरात फळे, कांदा बटाटा मुबलक उपलब्ध होईल. त्यामुळे ग्राहकांनी चढ्या दराने भाजीपाला खरेदी करु नये,’’ असेही देशमुख म्हणाले.  पुढारी अडते, कामगार नेते गायबच  शेतकऱ्यांच्या जिवावर गलेलठ्ठ झालेले, आणीबाणीच्या परिस्थितीत शेतकरी, ग्राहक, बाजार समिती आणि प्रशासनाला गरज असताना, बाजार समिती बंदसाठी आग्रही असलेले आडते असोसिएशनचे पदाधिकारी नेते, कामगार नेते रविवारी देखील बाजार आवारात फिरकले नाहीत. काही मोजक्या अडत्यांनी आणि कामगारांनी उपस्थित राहून बाजार आवार सुरळीत ठेवला होता.     

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

महाराष्ट्रासाठी आर्थिक विकासाची ‘गॅरंटी’, नवी दिल्ली भेटीत पंतप्रधानांचे आश्वासन

Crop Insurance : सोयाबीन पिकाला विम्याचा लाभ मिळालाच नाही

Pre Kharif Review Meeting : बोगस बियाणे विक्री रोखण्यासाठी भरारी पथके नेमा

Sharad Pawar : सध्याचे केंद्रातील सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात: शरद पवार

Mumbai Weather : मुंबईसाठी २२ दिवस धोक्याचे

SCROLL FOR NEXT