cats.jpg
cats.jpg 
मुख्य बातम्या

पूर्वहंगामी द्राक्षपीक रोगांच्या फेऱ्यात

टीम अॅग्रोवन

नाशिक: कसमादे भागात सटाणा, मालेगाव, देवळा व कळवण तालुक्यांत ३ हजार हेक्टरवर पूर्व हंगामी द्राक्ष उत्पादन घेतले जाते. त्यासाठी गोडी बहार छाटण्या जुलैपासून घेण्यात आल्या. मात्र सततचा पाऊस व दमट वातावरणामुळे करपा व डाऊनी  रोगांना पोषक वातावरण झाले. परिणामी  शेतात पाणी साचून प्रादुर्भाव वाढल्याने प्रामुख्याने थॉमसन, क्रिसमन, सुधाकर या जातीमध्ये घड जिरण्याचे व घडकूज समस्या निर्माण झाल्याने द्राक्ष हंगामाच्या अडचणी वाढल्या असल्याचे चित्र आहे. चालू वर्षी पावसाळा लवकर सुरू झाला. त्यामुळे अधिक काळ ढगाळ वातावरण, सूर्यप्रकाशाचा संपूर्ण ऑगस्ट महिन्यात अभाव  या कारणांमुळे हे नुकसान वाढल्याचे शेतकरी सांगत आहेत. जुलैमध्ये पहिल्या टप्प्यात छाटण्या झालेल्या काही बागा चांगल्या अवस्थेत आहेत. तर ७० टक्क्यांवर बागांमध्ये डाऊनी व भुरी रोगाचा प्रादुर्भाव अधिक असल्याने हे संकट वाढते आहे. मागील वर्षी द्राक्ष तयार झाल्यानंतर काढणी दरम्यान हे नुकसान झाले होते. मात्र आता गोडी बहार छाटणीनंतर माल तयार होण्याच्या अवस्थेतच समस्येने डोके वर काढले आहे.  परिणामी या भागातील काही शेतकऱ्यांनी नवीन जातीवर दुबार छाटण्या घेतल्या. तर १५ टक्के शेतकरी कांदा, टोमॅटो पिकाकडे वळू लागले आहेत. काहींनी उत्पादन न घेता बागा सोडून दिल्याचे पाहायला मिळत आहे.  वाढता उत्पादन खर्च ठरतोय डोकेदुखी  पूर्वहंगामी बागांना नियमित हंगामापेक्षा जवळजवळ १ लाख अधिक खर्च येतो. मात्र या परिस्थितीत शेतकऱ्यांना सलग दुसऱ्या वर्षी मोठ्या आपत्तीचा सामना करावा लागत आहे. त्यातच पीक संरक्षण खर्चात वाढ होत आहे. त्यामुळे मागील वर्षी संपूर्ण नुकसान झाल्यानंतर हाती भांडवल नाही. चालू वर्षी शेतकऱ्यांनी उसनवारी, सावकारी व बँकांकडून पैसा जमा करून हंगाम उभा केला. त्यातच आर्थिक फटका शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे.

अशी आहे परिस्थिती

  • जुलैमधील छाटलेल्या बागांमध्ये डाऊनी व फुलोरा अवस्थेत घडकूज 
  • १ ऑगस्टपासून पुढील छाटण्यामधील सर्व जातीमध्ये घड जिरण्याचे प्रमाण अधिक
  • हवामान बदलामुळे आर्द्रता वाढल्याने डाऊनी,करपा या रोगांचा प्रादुर्भाव
  • प्रतिक्रिया सलग दुसऱ्या वर्षी अस्मानी संकट आल्याने नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादक हवालदिल झाला आहे. संकट नक्कीच मोठे आहे. त्यातच उत्पादन घेऊन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर द्राक्ष विक्रीची भीती आहे. त्यामुळे सरकारी यंत्रणेने शेतकऱ्यांना धीर देणे गरजेचे आहे. - कृषीभूषण खंडेराव शेवाळे, प्रयोगशील द्राक्ष उत्पादक, भुयाने, ता. सटाणा 

    मागच्या वर्षी १६ एकर क्षेत्रावर द्राक्ष तयार असताना अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी आलेला घास मातीमोल झाला. यामध्ये ४० लाखांचा खर्च वाया गेला. आता पुन्हा तेच होत असल्याने काय करायचे ? हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. -पोपट जाधव, द्राक्ष उत्पादक शेतकरी, बिजोटे, ता. सटाणा

    कसमादे भागातील तालुकानिहाय क्षेत्र(हेक्टर)

    मालेगाव   ७१४
    सटाणा   ६५०
    कळवण  ८८.५
    देवळा   ७०

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Animal Care : वाढत्या तापमानात जनावरांचे व्यवस्थापन

    Lok Sabha Elections : चुरशीने मतदान; सकाळी ९ पर्यंत कोल्हापूर ८.०४ टक्के तर हातकणंगले ७.५५ टक्के मतदानाची नोंद

    Fish Farming : पुनर्वसनग्रस्ताला मिळाला मत्सशेतीतून मोठा आधार

    Turmeric Farming : हळदीची वाढली उत्पादकता

    Farmer As Life Partner : आदर्शवत विवाहसोहळा

    SCROLL FOR NEXT