Post-monsoon rains Hit on 12 thousand hectares
Post-monsoon rains Hit on 12 thousand hectares 
मुख्य बातम्या

मॉन्सूनोत्तर पावसाचा सांगलीत  १२ हजार हेक्टरवर फटका 

टीम अॅग्रोवन

सांगली : अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील द्राक्ष, ज्वारी, हरभरा, भाजीपाल्यासह ११ हजार ९३९ हेक्टरवरील पिकांना फटका बसला आहे. द्राक्ष बागांचे सर्वाधिक १० हजार ६३९ हेक्टरवरील नुकसान झाले. या नुकसानीचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाने आज राज्य शासनाकडे पाठवला आहे. शासनाने अद्यापही पंचनाम्याचे आदेश दिलेले नाहीत. मात्र येत्या दोन दिवसांत पंचनामे सुरू होण्याची शक्यता आहे.  जिल्ह्यात बुधवारी रात्रीपासून गुरुवारी पहाटेपर्यंत मुसळधार पाऊस झाला. त्यानंतरही जिल्ह्यात दोन दिवसांपासून पाऊस सुरू आहे. या पावसाने जिल्ह्यातील काढणीला आलेली आणि फुलोऱ्यात असणाऱ्या द्राक्ष बागांचे पावसाने मोठे नुकसान झाले. बागांमध्ये पाणी साचले असून, मण्यांना तडे जाऊन द्राक्षांचे घड कुजण्याच्या स्थितीत आहे. रब्बीच्या पिकांसह भाजीपाल्याचेही मोठे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसाच्या दणक्याने शेतकरी उद्‌ध्वस्त झाला आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोज वेताळ यांच्यासह अधिकाऱ्यांनी नुकसान झालेल्या द्राक्षबागांची पाहणी करून प्राथमिक माहिती घेतली.  जिल्ह्यातील ३८४ गावांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे २६ हजार ८४२ शेतकऱ्यांच्या १० हजार ६३९.४७ हेक्टर क्षेत्रातील द्राक्षबागांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाकडे पाठविलेल्या अहवालानुसार दहा हजार ६३९ हेक्टर क्षेत्रातील द्राक्ष बागांचे ५० टक्केपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. द्राक्षबागांचे नुकसान प्रशासनाकडून निश्चित करण्यात आलेले नसले तरी सुमारे तेरा ते पंधरा हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.  कवठेमहांकाळ तालुक्यात डाळिंबाचे ३४३ हेक्टर, मका ५६.६० हेक्टर, भाजीपाला १६८.१० हेक्टर, हरभरा १४६.२०, इतर पिके ५३ हेक्टर, मिरज तालुक्यात भाजीपाला ६५ हेक्टर, हरभरा १४.१० हेक्टर गहू ४ हेक्टर, वाळवा तालुक्यात भाजीपाला ३५.८० हेक्टर, हरभरा १३१.१० हेक्टर, गहू ६.२० हेक्टर, ज्वारी ३५४.७० हेक्टर, इतर पिके ५४.८० हेक्टर क्षेत्रातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. प्राथमिक नुकसानीचा हा अहवाल राज्य शासनाकडे शनिवारी पाठविला आहे. तसेच जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्याकडेही देण्यात आला आहे. अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या पिकांच्या पंचनाम्याबाबतचे आदेश अद्यापही शासनाने दिलेले नाहीत. मात्र जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामेही होणार आहेत. 

जिल्ह्यातील पिकांचे नुकसान (क्षेत्र हेक्टरमध्ये)  द्राक्ष १०.६३९  डाळिंबाचे ३४३  मका ५६.६०  भाजीपाला १६९.१०  हरभरा १४६.२०  इतर पिके ५३ हेक्टर  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

Kharif Sowing : साडेसात लाख हेक्टरवर जिल्ह्यात खरिपाचा पेरा

Shaktipeeth mahamarg : 'रस्त्यांवरच्या लढाईची शेतकऱ्यांनी तयारी करावी', शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांची एकजूठ

SCROLL FOR NEXT