मुख्य बातम्या

कपाशीवरील कीड-रोग म्हणजे कृषी विभागाचे अपयश

Vinod Ingole

यवतमाळ ः बीटी लागवड क्षेत्रात नॉनबीटी (रिफ्युजी) लावणे गरजेचे आहे; परंतु यामुळे उत्पादन घटते म्हणून याकडे दुर्लक्ष झाल्याने कीडरोगांचा प्रादुर्भाव वाढळा. त्यानंतर कीडरोगाच्या नियंत्रणासाठी अतिरेकी फवारणी होऊ लागली, असे तज्ज्ञांनी सांगितले. याविषयी जनजागृतीत कृषी विभाग कमी पडल्याचा आरोप आता होऊ लागला आहे. निसर्गाने सर्वांना जगण्याचा अधिकार दिला आहे. त्यानुसार बीटी आल्यानंतर कापसावर जीवनक्रम अवलंबून असलेल्या किडींचे काय? असा प्रश्‍न उपस्थित होत होता. बीटी कपाशीवर किडीचा प्रादुर्भाव कमी व्हावा तसेच किडींना जगण्यासाठी कपाशीची पान, बोंड मिळावी यासाठी बीटी लागवड असलेल्या शेतात नॉनबीटी (रिफ्युजी) काही प्रमाणात लावली जाते. ४५० ग्रॅम बीटीसोबत १२० ग्रॅम नॉनबीटी बियाणे पाकीट दिले जाते. त्याची लागवड करणे सक्‍तीचे आहे; परंतु नॉनबीटी बियाणे लावल्यामुळे तितके उत्पादन कमी होईल, म्हणून शेतकरी रिफ्युजी लावत नाही. या वर्षी यवतमाळ जिल्ह्यात ४ लाख ७० हजार हेक्‍टरपैकी एक हेक्‍टरवरदेखील नॉनबीटी लावले गेले नाही. त्यामुळे किडींमध्ये प्रतिकारशक्‍ती वाढली आणि परिणामी नुकसानीची पातळीदेखील. यावर नियंत्रणासाठी शेतकऱ्यांकडून अनावश्‍यक आणि शिफारसीत मात्रेपेक्षा अधिक कीडनाशकाची फवारणी झाली आणि अनेकांचे बळी गेले. कृषी विभागाला जनजागृतीत अपयश नॉनबीटी बियाण्याचे पाकीट बीटी बियाण्यासोबत दिले जाते; परंतु शेतकरी नुकसान होते म्हणून नॉनबीटी बियाणे लावत नाही. याविषयी कृषी विभागाने जागृती करणे गरजेचे होते; परंतु हंगामाच्या सुरवातीला कृषी अधिकारी फिरकतच नाहीत. चार-दोन ओळखीच्या लोकांपर्यंतच पोचतात आणि तेथेच फोटो काढून जागृती केल्याच्या बातम्या देतात, असा आरोप वागद (ता. महागाव) येथील शेतकरी मनीष जाधव यांनी केला.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT