पावसामुळे भात पिकाला मोड फुटले आहेत
पावसामुळे भात पिकाला मोड फुटले आहेत 
मुख्य बातम्या

रत्नागिरी जिल्ह्यात निमगरवी भात धोक्यात

टीम अॅग्रोवन

रत्नागिरी  ः अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्टा आणि बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाचे क्षेत्र यामुळे कोकण किनारपट्टीला पावसाचा तडाखा बसला आहे. त्याचा परिणाम येथील भात उत्पादनावर होणार असून ओल्या दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात तयार झालेले भात पीक आडवे झाल्यामुळे ते पुन्हा रुजून आले आहे. पावसामुळे सुमारे २५ हजार हेक्टरवरील निमगरवी भातपिकं धोक्यात आली आहेत.

जिल्ह्यात १ जूनपासून आतापर्यंत सरासरी ४९३६ मिलिमीटर पावसाची नोंद झालेली आहे. गतवर्षीच्या तुलनेत १३०० मिमी पाऊस अधिक झाला आहे. यंदा मोसमी पावसाला उशिराने सुरवात झाली; मात्र चारही महिने पावसाचा जोर कायम झाला. विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाने जिल्ह्याला चांगलेच झोडपून काढले. जिल्ह्यात यावर्षी ६९ हजार हेक्टरवर भात लागवड झाली. त्यात हळवी भात पिके १० हजार हेक्टरवर असून सुमारे २० ते २५ हजार हेक्टरवर निमगरवी भाताची लागवड झालेली आहे.

नवरात्री दरम्यान तयार झालेल्या हळवी भाताची कापणी पूर्ण झाली होती. निमगरवी भात कापणी योग्य झालेला असतानाच पावसाने गाठले. सप्टेंबर अखेरपर्यंतच पाऊस राहील अशी शक्यता होती; मात्र ऑक्टोबर संपत आला तरीही मॉन्सूनोत्तर पावसाचा जोर कायम राहिला आहे. सलग आठवडाभर पाऊस पडत असल्यामुळे भात शेतीचे नुकसान झाले आहे. तयार झालेले भात पीक आडवे होऊन पाण्यात भिजत आहे. अनेक ठिकाणी भाताला मोड आले आहेत तर काही ठिकाणी भात पुन्हा रुजला आहे.

गेल्या दहा वर्षांत प्रथमच एवढ्या मोठ्याप्रमाणात अशी अवस्था निर्माण झाली आहे. दिवसभर ढगाळ हवामान राहत असल्यामुळे भातकापणी करण्याचे धाडस शेतकरी करीत नाहीत. ज्यांनी भातकापणी केली, ते शेतकरी अडचणीत आले आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत अशीच स्थिती असून ओल्या दुष्काळाची भीती वर्तविली जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Delhi Farmers' protest : भाजपच्या उमेदवारांविरोधात पंजाबमध्ये शेतकऱ्यांचा रोष वाढला; एसकेएमचा विरोध कायम

Lok Sabha Constituency : कोल्हापूर जिल्ह्यातील ३७ लाख ५० हजार मतदारांचा कौल कोणाला? मतदान केंद्रे सज्ज

Fire in Nainital : उत्तराखंडच्या जंगलातील आग पोहचली शेताच्या बांधावर, एका महिलेचा होरपळून मृत्यू

Animal Ear Tagging : ...अन्यथा भरपाई अन् अनुदान नाही

Sunburn Crop : कोवळी रोपे वाचविण्यासाठी शेतकरी सरसावला

SCROLL FOR NEXT