नागपूर ः मृग बहर घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी पोषक, तर आंबिया बहर घेणाऱ्यांच्या अडचणीत भर टाकणारा अवकाळी पाऊस ठरला आहे. त्यासोबतच बागेत बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याने बुरशीनाशकाची फवारणी करावी लागेल, अशी माहिती संत्रा बागायतदारांनी दिली. विदर्भासह राज्यात आंबिया बहर घेणाऱ्या शेतकऱ्यांनी सध्या आपल्या बागा ताणावर सोडल्या आहेत. अवकाळी पावसामुळे आंबिया बहर फोडणाऱ्यांना अडचणीत वाढ झाली आहे. पावसामुळे आंबियाच्या नव्या फुटींवर परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. आंबिया बहर घेणाऱ्या शेतकऱ्यांकडून डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून बागेचे पाणी बंद केले जाते. त्यानंतर १० ते १५ जानेवारीपासून बागेला पाणी दिले जाते. अशा प्रकारे व्यवस्थापन केल्यानंतर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात फूलधारणा होण्यास सुरुवात होते. पावसामुळे हे सारे व्यवस्थापन प्रभावित झाल्याने आंबिया बहर घेणाऱ्या शेतकऱ्यांसमोरील अडचणीत वाढ झाली आहे. मृगाचे फळ सध्या झाडावर आहेत. मृग बहर घेणाऱ्या शेतकऱ्यांना या पावसामुळे कोणतेच नुकसान नसल्याचे सांगण्यात आले. बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बुरशीनाशकाची फवारणी घ्यावी लागेल, अशी माहिती देण्यात आली. वातावरणाचा परिणाम
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.