खानदेशात कांदा लागवड कमीच राहणार
खानदेशात कांदा लागवड कमीच राहणार 
मुख्य बातम्या

खानदेशात कांदा लागवड कमीच राहणार

टीम अॅग्रोवन

जळगाव  ः खानदेशात कांदा विपणन व्यवस्थेसंबंधी जळगाव, चाळीसगाव, अडावद (ता.चोपडा) व किनगाव (ता.यावल) येथील बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांना वाईट अनुभव येत असल्याने आगामी हंगामात लाल कांद्याची लागवड कमी होईल, असे संकेत मिळत आहे.  कांद्याचे दर लासलगाव (जि. नाशिक), सोलापूर, राहता (जि. नगर) या भागात १३०० ते १५०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत आहेत. मध्य प्रदेशातील इंदूर, बडवानी येथील बाजारातील तरही १३०० रुपयांवर पोचले आहेत. असे असताना जळगाव जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये मात्र नफेखोर खरेदीदार व अडतदारांच्या मनमानी कारभारामुळे दर १२०० रुपयांवर पोचले नाहीत. इतर ठिकाणी दर बऱ्यापैकी असतात, मग जळगावातच दर का कमी? असा प्रश्‍न शेतकरी उपस्थित करीत आहेत. बाजार समित्यांमधील विपणन व्यवस्थेवर जिल्हा उपनिबंधक कार्यालयासह इतर यंत्रणांचेदेखील लक्ष नाही. तपासणी, चौकशी, दरांची अंमलबजावणी, तोलाईचे वाढीव दर, तागाच्या गोण्यांचे अवाजवी दर या संदर्भात कुठलेही नियंत्रण जिल्हा उपनिबंधक कार्यालय आणत नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. परिणामी पुढे कांदा रोपवाटिका व लागवडही कमी होईल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.  जळगाव जिल्ह्यात केळी, पपईनंतर कांदा पिकाची लागवड वाढू लागली होती. तापी व गिरणाकाठी कांदा पीक वाढले होते. परंतु मागील वर्षभरात कांदा उत्पादकांना अडतदार व खरेदीदारांच्या मिलिभगतमुळे नुकसानीचा सामना करावा लागला आहे. यामुळे पुढे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी लागवड कमी करतील. यामुळे कांदा बियाणे बाजारातही फारशी उलाढाल होणार नाही, असे सांगण्यात आले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sadabhau Khot : 'आधी कडकनाथवर बोला', भर सभेत शेतकऱ्यांचा सदाभाऊ खोतांना सवाल

Onion Export Ban : केंद्र सरकारच्या चलाखीमुळे कांदा निर्यातीवरील लगाम कायम; शेतकऱ्यांना कितीपत फायदा होणार?

Kolhapur Water Shortage : गावांना टँकरद्वारे पाण्याची गरज, लोकप्रतिनिधी, प्रशासन निवडणुक कामात व्यस्थ

Agriculture Industry : उद्योगाच्या घरी रिद्धी-सिद्धी...

Success Story : अल्पभूधारकांच्या शेतात फुलली हिरवाई

SCROLL FOR NEXT