ऊस, गूळ हंगामात अडथळे
ऊस, गूळ हंगामात अडथळे 
मुख्य बातम्या

ऊस, गूळ हंगामात अडथळे

टीम अॅग्रोवन

कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या हलक्‍या ते मध्यम पावसाने हजेरी लावल्याने त्याचा प्रतिकूल परिणाम गूळ व ऊस हंगामावर झाला आहे. जिल्ह्याच्या पश्‍चिमेकडील भागात चांगला पाऊस झाल्याने तोडी काही काळ रोखण्याची वेळ आली. तर गुऱ्हाळघरांनीही आदणांची संख्या कमी केली. समुद्रात झालेल्या चक्रीवादळामुळे जिल्ह्यातील हवामानही ढगाळ व पावसाळी झाल्याने हंगामात व्यत्यय आला.

करवीर तालुक्‍याच्या पश्‍चिम भागातील शेकडो गुऱ्हाळे रात्रभर बंद ठेवली होती. तसेच जोरदार पाऊस येईल या भीतीने अनेक गुऱ्हाळघरचालकांना गुऱ्हाळासाठी लागणारी सरपण झाकून ठेवावे लागले. चक्रीवादळामुळे सर्वत्रच ढगाळ हवामान अद्यापही आहे. कोकण किनारपट्‌टीनजीक असणाऱ्या तालुक्‍यांमध्ये दोन दिवसांपासून थांबून थांबून हलका पाऊस सुरू आहे. यामुळे वाफसा स्थिती जाऊन शेत ओलसर झाल्याने उसाची वाहतूक करणे अशक्‍य झाल्याने कारखान्यांनी काही काळ तोडी बंद ठेवल्या.

चांगल्या रस्त्यावर ज्या शेतकऱ्यांचे ऊस प्लॉट आहेत, अशा प्लॉटना प्राधान्य देण्याचे काम पश्‍चिम भागातील काही कारखान्यांचे प्रतिनिधी करत असल्याचे चित्र होते. गगनबावडा, शाहूवाडी व राधानगरी परिसरात काहीसा दमदार तर हातकणंगले, शिरोळ तालुक्‍यात हलक्‍या स्वरुपाचा पाऊस दोन दिवसांपूर्वी झाला. गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत बुधवारी (ता. 6) हवामान चांगले असल्याने व काही काळ सूर्यप्रकाश असल्याने ऊस तोडणी विना व्यत्यय सुरू राहील, अशी शक्‍यता कारखानदारांनी व्यक्त केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orange Farmer : निवडणूक काळात संत्रा उत्पादक उपेक्षित

Chara Chavani : चारा छावण्या सुरू करण्याची पशुपालकांची मागणी

Cotton Sowing : महाराष्ट्रात कापसाचा पेरा राहणार ४२ लाख हेक्टरवर

Animal Heat Stress : वाढत्या उष्म्याचा पशुधनाला धोका

Agriculture Technology : शेती तंत्रज्ञान, पिकांबाबत शेतकरी साक्षर असणे गरजेचे

SCROLL FOR NEXT