rain possibility
rain possibility  
मुख्य बातम्या

मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात हलक्या पावसाची शक्यता

टीम अॅग्रोवन

पुणे: अरबी समुद्राच्या भागात कमी दाबाचे क्षेत्र असून त्याला लागून चक्राकार वाऱ्याची स्थिती सक्रिय आहे. त्यामुळे राज्यात ढगाळ हवामानाची स्थिती आहे. येत्या दोन ते तीन दिवस मध्य महाराष्ट्र, मरावाडा तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. तसेच ढगाळ हवामानामुळे तापमानात चढउतार होत असून गारठा कमी झाला आहे. गुरुवारी (ता. २६) दिवसभर राज्यातील अनेक भागांत ढगाळ हवामानाची स्थिती कायम होती. यामुळे किमान तापमानात वाढ झाली आहे. नाशिकमधील निफाड येथील गहू संशोधन केंद्रामध्ये १४.२ अंश सेल्सिअसची सर्वात कमी तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. गेल्या चार ते पाच दिवसांपासून राज्यात ढगाळ हवामानाची स्थिती कायम आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून राज्यात तुरळक ठिकाणी पावसाचा शिडकावा झाला होता आहे. बुधवारी (ता. २५) दिवसभर ढगाळ हवामान होते. सायंकाळी सहा वाजेनंतर अचानक ढग भरून आल्याने जुन्नर, पुणे, येवला, सिन्नर या भागांत पावसाला सुरुवात झाली.  त्यानंतर टप्याटप्याने राहुरी, नेवासा, औरंगाबाद, बुलडाणा, परभणी या भागांतही पावसाला सुरुवात झाली. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची काही प्रमाणात धांदल उडाली होती. मात्र, काढणी केलेल्या कांदा झाकण्यासाठी शेतकऱ्याची धावपळ झाली. तर गहू, हरभरा, द्राक्षे, डाळिंब, पेरू उत्पादक शेतकऱ्यांमध्ये सुरू झालेल्या पावसामुळे चिंतेचे वातावरण तयार झाले होते.  झालेल्या पावसामुळे गुरुवारी (ता. २६) सकाळी अनेक ठिकाणी धुक्याची चादर पसरली होती. तर काही ठिकाणी पिकांवर दवबिंदू पडले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना सकाळचे वातावरण सुखद वाटत असले तरी झालेल्या पावसामुळे चिंता कायम होती. साधारणपणे गुरुवारी दुपारपर्यंत राज्यात ढगाळ हवामानाची स्थिती होती. दुपारनंतर काही प्रमाणात ऊन पडल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी पिकांवर रोग, किडीचा प्रादुर्भाव चिंता कायम होती.   ढगाळ हवामानामुळे राज्यातील गारठा कमी झाला आहे. कोकणातील बहुतांशी भागातील किमान तापमानात दोन ते दोन अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. या भागात किमान तापमान २३ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. मध्य महाराष्ट्रासह, खानदेशातही गारठा चांगलाच कमी झाला असून किमान तापमानात चांगलीच वाढ झाली आहे. त्यामुळे किमान तापमान १४ ते २१ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. मराठवाड्यातही ढगाळ हवामानामुळे गारठा चांगलाच कमी झाला आहे.  किमान तापमान १९ ते २० अंश सेल्सिअसपर्यत होते. विदर्भातील अनेक भागांत गारठ्यात चढउतार आहे. यामुळे नागपूर, चंद्रपूर, बुलडाणा, गोंदिया, अमरावती, वर्धा, यवतमाळ या भागांतील तापमान १५ ते २० अशं सेल्सिअसच्या दरम्यान तापमान होते.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Scarcity : पाण्यासाठी महिलांची एक किमी पायपीट

Onion Export : कांदा निर्यातीची खोटी बातमी देऊन शेतकऱ्यांची दिशाभूल - अनिल घनवट

Beed Lok Sabha : बीडमध्ये ५५ वैध उमेदवार; छाननीअंती १९ उमेदवार बाद

Water Storage : मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा ७ ते ८ टक्क्यांवर

Green Hydrogen Project : हिमाचल प्रदेशच्या झाकरीत देशातील पहिला हरित हायड्रोजन प्रकल्प

SCROLL FOR NEXT