काजू, आंबा फळपीक विमा प्रश्‍न तडीस नेण्याची गरज
काजू, आंबा फळपीक विमा प्रश्‍न तडीस नेण्याची गरज 
मुख्य बातम्या

काजू, आंबा फळपीक विमा प्रश्‍न तडीस नेण्याची गरज

टीम अॅग्रोवन

रत्नागिरी ः फळपीक विमा योजनेअंतर्गत आंबा, काजू बागायतदारांना योग्य लाभ मिळाला नसल्याच्या तक्रारी रत्नागिरी जिल्ह्यात पुढे आल्या आहेत. एकाच मंडळातील बागायतदारांना वेगवेगळे निकष लावून लाभांश नाकारण्यात आल्याची तक्रार आंबा बागायतदार राजेंद्र कदम यांनी केली आहे. मात्र, त्यांना विमा कंपनीकडून सहकार्य मिळाले नाही. मुंबईत विमा कंपन्यांविरोधात शिवसेनेने दंड थोपटले होते. मात्र, रत्नागिरीतील आंबा बागायतदारांच्या प्रश्‍नासाठी स्थानिक शिवसैनिक प्रश्‍न तडीस नेणार का, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

फळपीक विमा योजनेअंतर्गत १ जानेवारी ते ३१ मे २०१९ या कालावधीकरिता कोतवडे, खेडशी व पावस मंडळातील (ता. रत्नागिरी) फळबागांची विमा रक्कम २८ डिसेंबर २०१९ ला दि न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनीकडे वर्ग केली. कंपनीच्या कोकणातील प्रतिनिधींकडे चौकशी केल्यानंतर पीकविम्याविषयी पुणे येथून कार्यवाही होत असल्याचे सांगण्यात आले. पुणे येथे संपर्क होऊ शकला नाही. तसेच कंपनीच्या स्कायमेट हवामान केंद्राकडून मंडळनिहाय माहिती (डाटा) रत्नागिरीतील आंबा, काजू व्यावसायिकांना दिली गेली नाही. ३१ मे २०१९ नंतर विमा मुदत संपते. पुढील ४५ दिवसांत शासन निर्णयाप्रमाणे इन्शुरन्स क्लेम मंडळनिहाय माहितीनुसार शेतकऱ्याच्या खात्यात मंजूर रक्कम वर्ग करणे जरुरीचे आहे. चार महिने होऊनही दि न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी आणि स्कायमेट हवामान केंद्राकडून फळपीक विमा योजनेअंतर्गत मंजूर नुकसानभरपाई दिलेली नाही. याबाबत माहिती विचारण्यास गेल्यानंतर उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. 

पुढील वर्षाच्या फळपीक विमा भरण्याची वेळ आली असतानाही मागील वर्षाच्या फळपीक विम्याबाबत कोणतीही उचित कार्यवाही झालेली नाही. मंडळनिहाय कमाल, किमान तापमान व पाऊस झाल्याप्रमाणे बाधीत शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळणे आवश्यक आहे. हवामान केंद्राकडील आकडेवारी जाहीर केल्यावर कंपनीकडून होत असलेला गोलमाल उघड होणार असल्याचे कदम यांनी स्पष्ट केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Rain : वादळी पावसाने टोमॅटो, मिरची, भेंडीसह ऊस पीक उद्धवस्त, नुकसान भरपाई मिळणार कधी?

Konkan Ranmeva : कोकणच्या रानमेव्यावर वातावरणाचा परिणाम, अनेकांचे आर्थिक गणित कोलमडणार

Agrowon Podcast : हळदीचे भाव तेजीतच; कापूस, सोयाबीन, गहू, लिंबू यांचे काय आहेत दर पाहुयात?

Ethanol Production : कांदा उत्पादकांच्या पाठोपाठ ऊस उत्पादकांनाही सरकारनं घोषणा करून भूलवलं ? | शेतीच्या बातम्या

Maharashtra Rain : राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा; देशातील अनेक भागात तापमानाचा पारा ४२ ते ४६ अंशाच्या दरम्यान

SCROLL FOR NEXT