The need for organic farming for health: Rohini Bhard
The need for organic farming for health: Rohini Bhard 
मुख्य बातम्या

आरोग्यासाठी सेंद्रिय शेती करण्याची गरज : रोहिणी भरड

टीम अॅग्रोवन

अंबाजोगाई, जि. बीड : ‘‘रासायनिक व हानिकारक कीटकनाशकांच्या अतिरिक्त वापरामुळे ग्रामीण भागाबरोबर शहरी भागातील कुटुंबियांचे आरोग्य खालावले आहे. यावर उपाय म्हणून सेंद्रिय शेती करण्याची गरज आहे’’, असे मत गृहविज्ञान विभागाच्या शास्त्रज्ञ रोहिणी भरड यांनी व्यक्त केले.  

दीनदयाल शोध संस्थान कृषि विज्ञान केंद्र, डीघोळअंबा गृह विज्ञान विभागांतर्गत कुटुंबांचे आरोग्य सुधारण्यासाठी पोषणमूल्य आधारित परस बागेचे प्रत्याक्षित घेण्यात आले. यावेळी भरड ‘परसबाग लागवड, व्यवस्थापन महत्व’ यावर मार्गदर्शन केले. 

भरड म्हणाल्या, ‘‘रासायनिक खत व हानिकारक कीटकनाशकांचा अतिरिक्त वापर केला जात आहे. यामुळे ग्रामीणसह  शहरी भागातील कुटुंबियांचे आरोग्य खालावत आहे. आता सेंद्रिय शेतीकडे वळले पाहिजे. परसबाग फक्त फळे व भाजीपाला या पुरतीच मर्यादित न ठेवता ज्वारी, मका व डाळीची पिके घ्यावी. ग्रामीण भागातील शेतकरी भाजीपाला लागवड करतात. परंतु, नफ्यासाठी रासायनिक औषधांची फवारणी करतात. याच भाजीपाल्यांचा समावेश त्यांच्या आहारातही होत आहे. त्यामुळे सर्वाचे आरोग्य खालावत आहे.’’

दहा गावांतील दहा- दहा महिला निवडून प्रत्येकीस एका गुंठ्यावर परसबाग लागवड करण्याचे आवाहन त्यांनी केले. या १०० महिलांना पालक, चुका, मिरची, टोमॅटो, भेंडी, गवार, वांगे, मुळा, बीट, दोडका, भोपळा, शेवगा व आंबा बियाने व रोपे वाटप करण्यात आली. हे प्रात्यक्षिक चंदन सावरगाव, कुंबेफळ, पूस, कोद्री, डीघोळअंबा, होळ, पळसखेडा, सावळेश्वर व  मांडवा या अंबाजोगाई व केज तालुक्यातील गावांत घेतले गेले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : कापूस वायद्यांमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, गहू यांचे काय आहेत दर ?

Agriculture Update : विकसित केलेले वाण शेतकऱ्यांनी वापरावे : कलंत्रे

Fodder Shortage : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ११.८७ लाख टन चाऱ्याची उपलब्धता

PM Narendra Modi : 'मागील ६० वर्षांच्या काळात एससी/एसटी/ओबीसींची सर्वात वाईट अवस्था'; मोदी यांची काँग्रेसवर टीका 

Maharashtra Rain : उद्यापासून पावसाची स्थिती काय राहील? राज्यातील बहुतांशी ठिकाणी ऊन आणि पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT