भारत इंडिया फोरमच्या स्थापनेनिमित आयोजित चर्चासत्राप्रसंगी बोलताना श्री. पाटील.
भारत इंडिया फोरमच्या स्थापनेनिमित आयोजित चर्चासत्राप्रसंगी बोलताना श्री. पाटील. 
मुख्य बातम्या

उदारीकरणाच्या नावाखाली उत्पादन क्षेत्राचे नुकसान : नानासाहेब पाटील

टीम अॅग्रोवन

पुणे   : देशात १९९१ मध्ये उदारीकरणाद्वारे आपण जगाला बाजारपेठ खुली करून देत असताना आयात शुल्क शून्यावर आणले, त्यामुळे आपल्याकडील उद्योगधंद्याचा पाया ढासळण्यास सुरवात झाली. उदारीकरणाच्या नावाखाली आपण उत्पादन क्षेत्राचे न भरून येणारे नुकसान केले, अशी टीका कृषी विभागाचे माजी अतिरिक्त मुख्य सचिव नानासाहेब पाटील यांनी केली. 

भारत इंडिया फोरमच्या स्थापनेनिमित रविवारी (ता. १६) आयोजित चर्चासत्राप्रसंगी श्री. पाटील बोलत होते. या वेळी अध्यक्षस्थानी लेखक, पत्रकार विनय हर्डीकर, तसेच सह्याद्री फार्मचे व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे उपस्थित होते.  

श्री. पाटील म्हणाले की, ‘‘आपल्याकडील शेतीवरील भार अधिक आहे. शेतीतील लोकसंख्या इतर उद्योगांत आणणे हे आपल्यापुढे मोठे आव्हान आहे. शेतीतील होत असलेले तुकडे आणि त्यातून मिळणारे उत्पन्न तोकडे पडत असल्यामुळे शेतीतील समस्या वाढत आहे. शेतकऱ्यांना चांगले बियाणे, नवे तंत्रज्ञान, व्याजाचा कमी दर असलेला कर्जपुरवठा, यांत्रिकीकरण अशा सुविधा देण्यासाठी राज्यकर्त्यांनी प्रयत्न करायला हवेत.’’

‘‘जगाच्या बाजारपेठेत जे विकेल ते पिकविण्याकडे शेतकऱ्यांना नेण्याची आवश्यकता आहे. हे काम संघटित समूह, कंपन्या, चांगल्या पद्धतीने करू शकतात. शहर आणि ग्रामीण असा वाद न करता काम केल्यास निश्चितपणे विकास होईल. यातून प्रक्रिया उद्योगाचे जाळे उभे राहील, अशा पद्धतीची धोरणे राबवून शेतकऱ्यांना प्रोत्साहित करून शेतीवर पडत असलेला अतिरिक्त भार कमी होण्यास मदत होईल,’’ असे श्री. पाटील यांनी सांगितले. 

श्री. शिंदे म्हणाले की, ‘‘पारंपरिक शेतीचे चित्र हे पूर्णपणे अंधातरी आहे. जागतिक पातळीबरोबर देशाची बाजारपेठ काबीज करण्यासाठी समूह शेती हाच त्यावर योग्य उपाय आहे. अन्यथा, त्याच पिकांबाबत होणारी आंदोलने यात बदल होताना दिसणार नाही. चीनने त्यामध्ये योग्य तो बदल केला आणि कृषी उत्पादने निर्यातीमध्ये आज ते आपल्यापुढे आहेत. भारतात आज द्राक्षाची उलाढाल पंधरा हजार कोटींची आहे. निर्यातीच्या माध्यमातून आपण ती ५० हजार कोटींपर्यंत वाढवू शकतो. जगाच्या तुलनेत आपल्याला हे उत्पादन परवडणारेही आहे. याकरिता शेतीला तंत्रज्ञानाची जोड देऊन शेतमालाच्या उत्पादनाबरोबर उत्पादकतावाढीसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, तरच आपण जागतिक बाजारपेठेत टिकाव धरू शकतो.’’

श्री. हर्डीकर यांनी फोरम संदर्भातील विवेचन केले. रमेश जाधव यांनी प्रास्तविक केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी दीपक चव्हाण, नीलेश शेजवळ प्रयत्नशील होते. सूत्रसंचालन डॉ. दिनेश भोसले यांनी केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

Kharif Sowing : साडेसात लाख हेक्टरवर जिल्ह्यात खरिपाचा पेरा

Shaktipeeth mahamarg : 'रस्त्यांवरच्या लढाईची शेतकऱ्यांनी तयारी करावी', शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांची एकजूठ

SCROLL FOR NEXT