कौशल्य विकासातून शेती होणार शाश्‍वत : मुख्यमंत्री फडणवीस
कौशल्य विकासातून शेती होणार शाश्‍वत : मुख्यमंत्री फडणवीस 
मुख्य बातम्या

कौशल्य विकासातून शेती होणार शाश्‍वत : मुख्यमंत्री फडणवीस

सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई  : प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेच्या अंमलबजावणीमुळे राज्यातील शेतकऱ्यांना आधुनिक आणि प्रयोगशील शेतीबाबत प्रशिक्षण मिळणार आहे. हा उपक्रम पथदर्शी प्रकल्प ठरणार असून, शेती क्षेत्रात परिवर्तन घडण्यास मदत होणार अाहे. यामुळे कुशल बळिराजा आधुनिक आणि शाश्‍वत शेती विकासासाठी सज्ज होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेंतर्गत महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास संस्थेच्या छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता आणि कौशल्य विकास अभियानाचे उद्‌घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी (ता. १९) मंत्रालयात करण्यात आले. त्या वेळी कृषिमंत्री चंद्रकांत पाटील, कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, जलसंधारण सचिव एकनाथ डवले, कौशल्य विकास सचिव असीम गुप्ता, कौशल्य विकास आयुक्त विरेंद्र सिंह आदी मान्यवर उपस्थित होते.  मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, शेतकऱ्यांना कृषी आधारित कौशल्य विकासाचे प्रशिक्षण दिले जाणार असल्यामुळे गावामध्येच रोजगार निर्मिती होण्याबरोबर शेतकऱ्यांच्या कुटुंबातील तरुण तरुणींना याचा प्रत्यक्ष लाभ घेण्यास मदत होणार आहे. स्व. नानाजी देशमुख कृषी साह्य योजना आणि ॲग्री बिझनेस याबाबत माहिती मिळविणे, या योजनांचा लाभ घेणे, शेती बाजाराशी समन्वय करणे आणि शेतीतील उत्पादकता वाढविणे या प्रशिक्षण कार्यक्रमातून शक्‍य होणार आहे. प्रधानमंत्री कौशल्य विकास कार्यक्रम अंतर्गत शेतकरी कुशल प्रशिक्षणामुळे गटशेतीतून कौशल्य विकास करणे शक्‍य होणार आहे. कौशल्य विकास अभियानाच्या उदघाटन प्रसंगी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ... Video प्रगत तंत्रज्ञान आधारित शेती पद्धतीमुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होणे शक्‍य होणार आहे. गेल्या काही वर्षांत शेतीमध्ये होत असलेले बदल, पावसाची अनियमितता यामुळे शेतीची शाश्वता कमी होत आहे. पिके चांगली येण्यासाठी वापरण्यात येत असलेली अधिकची रासायनिक खते, वाढलेले बाजारभाव हे सगळे पाहता कृषी क्षेत्रात प्रशिक्षण मिळणे आवश्‍यक आहे. कौशल्य विकास विभागामार्फत शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणामुळे शाश्वत शेतीकडे आपल्याला जाणे शक्‍य होणार आहे, असे फडणवीस यांनी या वेळी सांगितले. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मुलांना कौशल्य आधारित प्रशिक्षण दिले जाणार असून याचा लाभ जवळपास तीन लाख युवकांना होणार आहे. राज्यातील शेतकरी आणि तरुणांसाठी स्वयंरोजगार आणि व्यवसायाकरिता संधी निर्माण होण्यासाठी कौशल्य प्रशिक्षण अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या विविध योजनांच्या माध्यमातून राबविण्यात येणार असल्याचे कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी सांगितले. फडणवीस यांनी या प्रशिक्षण उपक्रमाचा प्रारंभ केला असून, त्या वेळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्रशिक्षण घेणारे यामध्ये सहभागी झाले होते.  महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास संस्थेच्या वतीने सिमॅसिस लर्निंग एलएलपी आणि पॅलेडियम कन्सल्टींग इंडिया प्रा. लि. हा जागतिक पातळीवरील तज्ज्ञ समूह या कार्यक्रमाची राज्यात अंमलबजावणी करणार आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Export : कांदा निर्यातबंदी उठवली, मात्र निर्यात वाढणार नाही याचीही सोय केली

Indian Monsoon : पाऊसकाळ उत्तम, पुढे काय?

Bachchu Kadu : देशात धर्म नाहीतर शेतकरी संकटात, बच्चू कडूंचा विरोधकांवर 'प्रहार'

Water Scarcity : आडातच नाही, तर...

Agriculture Department : राज्याला मिळेना विस्तार संचालक

SCROLL FOR NEXT