monsoon
monsoon  
मुख्य बातम्या

मॉन्सूनने घेतला देशातून निरोप

टीम अॅग्रोवन

पुणे ः परतीच्या पावसाला देशातून माघार घेण्यासाठी पोषक स्थिती झाल्याने नैऋत्य मॉन्सूनने संपूर्ण देशातून बुधवारी (ता. २८) माघार घेतली. महाराष्ट्रासह संपूर्ण देशातून मॉन्सूनचे वारे परतले असून दक्षिण भारतातील राज्यांमध्ये ईशान्य मोसमी वारे सक्रिय झाल्याची माहिती हवामान विभागाच्या सूत्रांनी दिली. यंदा मॉन्सून साधारणपणे एक जून रोजी केरळात दाखल झाला होता. त्यानंतर ११ जून रोजी मॉन्सून महाराष्ट्रात दाखल होत १४ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्र व्यापला होता. त्यानंतर वेगाने उत्तरेकडे सरकून संभाव्य वेळेच्या बारा दिवस अगोदर २६ जून रोजी मॉन्सून वाऱ्यांनी संपूर्ण देशव्यापला. या कालावधीत राज्यासह देशात अनेक ठिकाणी कमीअधिक स्वरूपात पाऊस पडला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनाही चांगला दिलासा मिळाला. साधारणपणे राजस्थानमध्ये तीन महिने दोन दिवस मुक्काम केल्यानंतर २८ सप्टेंबर रोजी मॉन्सून परतीवर निघाला. हवामान विभागाने १७ सप्टेंबर ही परतीच्या मॉन्सूनची तारीख जाहीर केली होती. मात्र, तब्बल अकरा दिवस उशिराने मॉन्सूनने पश्चिम राजस्थानातून परतीचा प्रवास सुरू केला होता. 

त्यानंतर सहा ऑक्टोबरपर्यंत बहुतांशी वायव्य आणि उत्तर भारतातून वारे परतले होते. परंतु ९ ऑक्टोबरच्या दरम्यान बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्रामुळे परतीचा प्रवास जवळपास पंधरा दिवस रेंगाळला होता. त्यानंतर २१ ऑक्टोबर रोजी पूर्व भारतातून मॉन्सूनने माघार घेतली होती. तर २६ ऑक्टोबर रोजी निम्म्या महाराष्ट्रासह देशाच्या बहुतांशी भागातून परतीचा मॉन्सून परतल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी जाहीर केले होते. चालू वर्षी सुधारित वेळापत्रकानुसार १५ ऑक्टोबरपर्यंत मॉन्सूनने देशातून निरोप घेणे अपेक्षित होते. मात्र, कमी दाबाच्या क्षेत्रामुळे परतीचा प्रवास चांगलाच लांबला होता. देशात एक जूनला दाखल झालेल्या मॉन्सूनने देशभरात तब्बल चार महिने २७ दिवस मुक्काम केला असून बुधवारी(ता.२८) मॉन्सूनने देशातून निरोप घेतल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

मॉन्सूनच्या माघारीचा कालावधी

वर्ष   परतीचा दिवस
२०१९   १६ ऑक्टोबर
२०१८   २१ ऑक्टोबर
२०१७  २५ ऑक्टोबर
२०१६ २८ ऑक्टोबर
२०१५   १८ ऑक्टोबर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sadabhau Khot : 'आधी कडकनाथवर बोला', भर सभेत शेतकऱ्यांचा सदाभाऊ खोतांना सवाल

Onion Export Ban : केंद्र सरकारच्या चलाखीमुळे कांदा निर्यातीवरील लगाम कायम; शेतकऱ्यांना कितीपत फायदा होणार?

Kolhapur Water Shortage : गावांना टँकरद्वारे पाण्याची गरज, लोकप्रतिनिधी, प्रशासन निवडणुक कामात व्यस्थ

Agriculture Industry : उद्योगाच्या घरी रिद्धी-सिद्धी...

Success Story : अल्पभूधारकांच्या शेतात फुलली हिरवाई

SCROLL FOR NEXT