जगण्यासाठी जत तालुक्यातून स्थलांतर
जगण्यासाठी जत तालुक्यातून स्थलांतर 
मुख्य बातम्या

जगण्यासाठी जत तालुक्यातून स्थलांतर

Abhijeet Dake

सांगली : ‘‘कधी काळी मृगजळ म्हणायचे, आता मात्र आम्ही जवळून पाहतूया. गारठ्याच्या दिसात भलामोठा जोधळ्यांनी भरलेला असायचा, आता मात्र उन्हाळ्याच्या आधीच रखरखलाय. शेतात जनावरं चारायला, नेली तर त्यांना बी दूरवर मृगजळ दिसतय. पाण्याच्या आशेनं तिकडं धावत्यात, जवळ गेल्यावर कळतय, काहीच नाही. पाऊणशे वर्षांत कधी घेतला नाही, असा अनुभनव घेतूया. वयाची ८० वर्षे ओलांडलेले बादशहा बिरुळ यंदाच्या दुष्काळाची दाहकता सांगत होते. दावणी रित्या होऊ नयेत म्हणून जित्राबं पोसावं वाटतंय, पण आता तेवढी ताकद राहिली नाही. सरकार काही करत नाही, अन जनावरं विकून चारा घ्यायचा, असं मन तयार होत नाही. अशी हतबलताही बादशहा यांनी व्यक्त केली.

जत तालुक्यातील सगळी शिवारं पिकाविना मोकळी आहेत. शेतात जळलेल्या पिकांचे अवशेष दिसत होते. ते खाण्यासाठी शेळ्या-मेंढ्यांचे कळप फिरत होते. शेतात काहीच पिकलं नाही. घरातील धान्य संपत आले आहे. तसचे प्रपंच चालविण्यासाठी शेळ्या-मेंढ्यांची विक्री करून हातभार लावत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. हाताला काम काहीच मिळत नाही. रोजगार हमीची कामे सुरू केली असं सांगितलं, पण कुठेच कामे सुरू नसल्याचे दिसते. त्यामुळे हाताला काम आणि प्रपंचासाठी लागणारा पैसा कमविण्यासाठी गाव सोडून जाण्याचा विचार इथल्या ग्रामस्थांनी व्यक्त केला. 

उलाढाल ठप्प दुष्काळामुळे प्रपंचाला लागणाऱ्या वस्तू खरेदी करण्यावर मर्यादा आल्या आहेत. शेतात काहीच पिकले नसल्याने खरेदीसाठी पैसेच शिल्लक नाहीत. उधारी वाढत आहे. आठवडा बाजारातही धान्य, भाजीपाल्याची आवक कमी झाल्याने महागाई वाढण्याची शक्यता आहे. असे दुकानाचे मालक अप्पासाहेब चिकाटे यांनी सांगितले.

जगण्यासाठी स्थलांतर जत तालुक्यात दरवर्षी दुष्काळ वाढू लागला आहे. हाताला काम नसल्याने इथला शेतकरी आपले बिऱ्हाड घेऊन पैसे कमविण्यासाठी ऊसतोडणीसाठी जाऊ लागला आहे. तालुक्यातून दरवर्षी सुमारे ८ ते १० हजार नागरिक ऊस तोडणीसाठी गावे सोडत आहेत. दुष्काळाची दाहकता अशीच राहिली तर हे शेतकरी, मजूर  पुन्हा परत येण्याची शक्यता नाही.

जित्राबं विकायची अन् चारा घ्यायचा तालुक्यात प्रत्येकाच्या दावणीला जित्राबं आहेत. त्यामुळे आर्थिक प्रपंचाला हातभार लागतोय. पण यंदा रब्बी हंगाम आणि खरीप हंगाम वाया गेला. त्यामुळे चारा मिळेणासा झाला आहे. चारा विकत घ्यायचं म्हंटल तर पुरेसा पैसा हाती नाही. यामुळे दावणीला बांधलेली दोन-तीन जित्राबं विकायची आणि वाकळेला चारा विकत घ्यायचा. २५०० ते ३००० रुपये शेकड्याने घेतलेला चारादेखील कमी पडतोय. तात्काळ चारा छावण्या सुरू कराव्यात अशी मागणी होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Care : वाढत्या उष्णतेचा पशुधनास फटका

Public Well Policy : सार्वजनिक विहिरींच्या पुनरुज्जीवनावर धोरण काय?

Agriculture Irrigation : ‘म्हैसाळ’चे पाणी माडग्याळ शिवारात

Jalgaon Lok Sabha : ...तर जळगावचे चार खासदार पोहोचतील लोकसभेत

Banana Orchard Burn : सातपुड्याच्या पायथ्याशी केळी बागा करपल्या

SCROLL FOR NEXT