आंब्याची बागायतदारांकडून होतेय  शेवटच्या टप्प्यातील काढणी
आंब्याची बागायतदारांकडून होतेय शेवटच्या टप्प्यातील काढणी 
मुख्य बातम्या

आंब्याची बागायतदारांकडून होतेय शेवटच्या टप्प्यातील काढणी

टीम अॅग्रोवन

चिपळूण : वाशी येथील एपीएमसी मार्केटमध्ये आंब्याचा दर कमी झाल्याने बागायतदार खासगी विक्रीबरोबर कॅनिंगसाठी आंबा घालत आहेत. अवीट गोडी असणाऱ्या हापूस आंब्याचा हंगाम आता अंतिम टप्प्यात आहे. पावसाने सवड दिल्याने बागायतदार शेवटच्या टप्प्यातील आंबा काढण्याच्या कामामध्ये व्यस्त आहेत.

हवामानातील बदलामुळे या वर्षी एकूणच हापूसचे उत्पादन कमी राहिले. अति थंडीमुळे आलेल्या पुनर्मोहोराचा आंबा उत्पादनावर परिणाम झाला. त्यातच सुरवातीपासून थ्रीप्स, तुडतुडा व बुरशीसारख्या रोगामुळे मार्चपर्यंत शेतकऱ्यांना कीटकनाशकांची फवारणी करावी लागत होती. पहिल्या टप्प्यातील आंबा एप्रिलमध्येच संपला. दुसऱ्या टप्प्यात फारशी फलधारणा नव्हती. परिणामी उत्पन्न किरकोळ होते.

तिसऱ्या टप्प्यातील आंब्यावर थ्रीप्स प्रादुर्भाव भरपूर असल्याने फळांचा आकार कमी झाला. सध्या तिसऱ्या टप्प्यातील आंबा काढणी सुरू आहे. १०० ते ३०० रुपये डझन दराने मुंबई मार्केटमध्ये विक्री सुरू असल्याने पॅकिंग, वाहतूक, हमाली, तोलाई खर्च परवडेनासा झाल्याने शेतकऱ्यांनी किरकोळ विक्री सुरू केली.

मुख्य रस्त्यालगत स्टॉल लावण्यात येत असल्यामुळे पर्यटकांकडून खरेदी होत आहे. वर्गवारी करून निवडक आंबा पेट्यांमध्ये भरला जातो. उर्वरित आंबा किलोवर कॅनिंगला घातला जातो. २५ ते २६ रुपये किलो दराने आंबा खरेदी सुरू आहे.

किलोवर आंबा घातल्यास अन्य खर्च वाचत असल्याने बागायतदारांचा फायदा होत आहे. पुढच्या आठवड्यापर्यंत आंबा काढणी संपणार आहे. हापूसबरोबर रायवळ, पायरी, केशर आदी प्रकारचे आंबे विक्रीसाठी येत आहेत. कच्च्याबरोबर पक्क्‍या आंब्यांना प्राधान्याने मागणी होत आहे. पर्यटक वाहने थांबवून आंबा खरेदी करीत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Delhi Farmers' protest : भाजपच्या उमेदवारांविरोधात पंजाबमध्ये शेतकऱ्यांचा रोष वाढला; एसकेएमचा विरोध कायम

Lok Sabha Constituency : कोल्हापूर जिल्ह्यातील ३७ लाख ५० हजार मतदारांचा कौल कोणाला? मतदान केंद्रे सज्ज

Fire in Nainital : उत्तराखंडच्या जंगलातील आग पोहचली शेताच्या बांधावर, एका महिलेचा होरपळून मृत्यू

Animal Ear Tagging : ...अन्यथा भरपाई अन् अनुदान नाही

Sunburn Crop : कोवळी रोपे वाचविण्यासाठी शेतकरी सरसावला

SCROLL FOR NEXT