पुणे : जिल्ह्यातील कोरेगाव भीमा येथे झालेल्या घटनेनंतर जाहीर महाराष्ट्र बंदला बुधवारी काही हिंसक अपवाद वगळता राज्यात चांगला प्रतिसाद मिळाला. बंदमुळे शेतीमाल वाहतुकीला फटका बसला, तर राज्यातील अनेक बाजार समित्यांचे व्यवहार ठप्प राहिल्याने शेतकऱ्यांची गैरसोय झाली. कोरेगाव भीमा येथील दंगलप्रकरणी राज्यात डाव्या अाणि दलित संघटनांकडून बुधवारी (ता. ३) बंद पुकारण्यात आला होता. यास राज्यातील बहुतांश भागांत प्रतिसाद मिळाला. संसदेतही या घटनेचे पडसाद उमटले. कॉँग्रेसकडून कोरेगाव भीमा येथील दंगलीचा मुद्दा लोकसभेत काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी उपस्थित केला. दलित संघटनांनी अनेक ठिकाणी रास्ता रोको केले, शहरात रॅली काढून बंदचे आवाहन केले. अनेक भागात शैक्षणिक, खासगी संस्था, खासगी आणि सरकारी वाहतूक व्यवस्था बंद होत्या, यामुळे जनजीवन विस्कळित झाले. सायंकाळी ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी बंद मागे घेण्यात येत असल्याचे जाहीर केले. बंदमुळे असे झाले नुकसान...
राज्यभरातील बंदचे पडसाद...
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.