संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

अल्पभूधारक शेतकऱ्यांचे खावटी कर्ज माफ होणार

टीम अॅग्रोवन

मुंबई : शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी राज्य सरकारने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेमधून वगळण्यात आलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांची खावटी कर्जे माफ करण्याचा निर्णय कर्जमाफीसंबंधी नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीने घेतला आहे. एकरकमी कर्ज परतफेड योजनेला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचाही निर्णय शासनाने केला आहे.

शेतकरी कर्जमाफीचा आढावा बैठक महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत मंत्रालयात झाली. या वेळी सहकारमंत्री सुभाष देशमुख, परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत आजपर्यंत २३ लाख ५१ हजार कर्ज खात्यांवरील शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले असून, त्यापैकी २२ लाख १३ हजार खात्यांवर कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ मिळाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी या वेळी दिली.

अल्पभूधारक शेतकऱ्यांनी शेतीसाठी घेतलेली खावटी कर्ज माफ करण्यासंबंधी राज्य शासन विचार करत होते. यावर मंत्रिमंडळ उपसमितीमध्ये चर्चा होऊन अल्पभूधारक शेतकऱ्यांची खावटी कर्जे माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती श्री. पाटील यांनी बैठकीनंतर दिली.या निर्णयाचा लाभ घेण्यासाठी अल्पभूधारक शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज करावे लागणार आहेत. त्यासाठी १ नोव्हेंबरपर्यंत http://aaplesarkar.maharashtra.gov.in/en/ संकेतस्थळावरुन ऑनलाइन नोंदणी करावी लागणार आहे.

ओटीएसला तीन महिने मुदतवाढ कर्जमाफी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना एकरकमी परतफेड करण्यासाठी ३० सप्टेंबर २०१८ पर्यंतची मुदत देण्यात आली होती. त्याला आता तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत शेतकरी याचा लाभ घेऊ शकणार आहेत. यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT